शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पोलीस महानिरीक्षकांचा जिल्ह्यात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:08 IST

वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे १३ डिसेंबरनंतर दोन दिवस जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहे. या काळात ते तीन पोलीस ठाणे, तीन एसडीपीओ कार्यालये व अन्य शाखांना भेटी देणार आहे.

ठळक मुद्देवार्षिक निरीक्षण : तीन पोलीस ठाणे, एसडीपीओ कार्यालये, विविध शाखांची ‘कामगिरी’ तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे १३ डिसेंबरनंतर दोन दिवस जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहे. या काळात ते तीन पोलीस ठाणे, तीन एसडीपीओ कार्यालये व अन्य शाखांना भेटी देणार आहे.जिल्हा पोलीस दलाअंतर्गत काही ठाण्यांचे वार्षिक निरीक्षण आटोपले. आता पोलीस दलाला महानिरीक्षकांच्या निरीक्षणाचे वेध लागले आहे. त्या दृष्टीने साफसफाईची जोरदार मोहीम राबविली जात आहे. नियोजित कार्यक्रमाशिवाय महानिरीक्षक अचानक एखादे पोलीस ठाणे अथवा शाखेला भेट देण्याची शक्यता पाहता सर्वच जण अलर्ट आहेत. मुंबईतील आयपीएस अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेमुळे हे निरीक्षण दोन दिवस लांबणीवर पडले आहे. महानिरीक्षक कार्यालयाची चमू निरीक्षणासाठी आधीच जिल्ह्यात दाखल झाली आहे. स्वत: महानिरीक्षक १३ डिसेंबरपासून जिल्ह्यात येणार आहे. दारव्हा पोलीस ठाणे, पुसदचे एसडीपीओ कार्यालये, उमरखेड पोलीस ठाणे, यवतमाळ शहर पोलीस ठाणे, पांढरकवडा व वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांचे निरीक्षण केले जाणार आहे. आस्थापना शाखा, पत्रव्यवहार शाखा, लेखा शाखा, पोलीस मुख्यालय, जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा, मोटर वाहन विभाग, रुग्णालय, बीडीडीएस, कल्याण शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा यांचाही टिपणी वाचनाद्वारे धावता आढावा घेतला जाणार आहे. या निरीक्षण काळात ‘आलबेल’ दाखविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेकडून होण्याची शक्यता आहे. महानिरीक्षक तरवडे हे परंपरागत निरीक्षण सोडून जिल्ह्यात अकस्मात वेगळे काही निरीक्षण करतात का याकडे लक्ष लागले आहे. अशा निरीक्षणासाठी इच्छाशक्ती लागते एवढे निश्चित.गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी थंडबस्त्यातग्रामीण महाराष्ट्रातील मटका, जुगार, अवैध दारू व तमाम अवैध धंदे बंद करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी दिले होते. हे धंदे बंद आहेत की नाही हे तपासण्याची जबाबदारी पोलीस महानिरीक्षकांवर सोपविण्यात आली होती. या आदेशानंतर काही दिवस धंदे चोरुन-लपून चालले. मात्र अवघ्या काही दिवसातच पुन्हा जैसे थे सुरू झाले. अलिकडे तर हे धंदे आणखी वाढल्याचे चित्र आहे. पोलीस कार्यालये, लोकप्रतिनिधींच्या घरांपासून हाकेच्या अंतरावर हे धंदे सुरूआहे. त्यानंतरही पोलिसांची बघ्याची भूमिका आहे. ते पाहता ‘लाभ’दायक अवैध धंद्यांपुढे पोलीस यंत्रणा गृहराज्यमंत्र्यांनाही जुमानत नसल्याचे स्पष्ट होते. खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे पाहता अमरावतीच्या पोलीस महानिरीक्षकांचे पथकही कुचकामी ठरल्याचे दिसते. स्थानिक पोलिसांच्या ‘सपोर्टिंग’ भूमिकेला अमरावतीतूनही पाठबळ नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आता तर या अवैध धंद्यांबाबत गृहराज्यमंत्र्यांकडूनही बंद झाले का म्हणून पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही जनतेतून साशंकतेने पाहिले जात आहे. आता महानिरीक्षकांच्या भेटी दरम्यान त्यांच्या निरीक्षण मार्गावरील धंदे बंद ठेवण्याची सावधगिरी स्थानिक पोलीस यंत्रणेकडून बाळगली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसाचा खुनी अद्याप फरारचमारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खून प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम (हिवरी) हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याच कारणावरून महासंचालकांनी स्थानिक पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जाते. आठवडाभर २०० ते २५० पोलिसांची फौज तैनात करूनही मारेकरी न सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. त्यातच मृतकाच्या घरी सांत्वना भेट देण्यासाठी प्रशासनाने विलंब लावला, त्यांच्या उच्च पदस्थांना तर त्याचीही गरज न वाटल्याने मृताचे नातेवाईक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस