शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

आणेवारीत आठ तालुक्यांवर अन्याय

By admin | Updated: November 13, 2015 02:19 IST

जिल्ह्याची सुधारित पीक आणेवारी जाहीर करताना आठ तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे.

यवतमाळ : जिल्ह्याची सुधारित पीक आणेवारी जाहीर करताना आठ तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, १६ पैकी केवळ आठच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे उर्वरित आठ तालुक्यांमध्ये शासनाप्रती रोष निर्माण झाला आहे. यापूर्वी नजर आणेवारीत जिल्ह्यातील केवळ दोनच गावातील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखविण्यात आली होती, तर २०५३ गावातील आणेवारी सरासरी ६३ टक्के दाखविल्याने या गावांना दुष्काळी लाभापासून वंचित राहावे लागले. जिल्ह्यात यावर्षी प्रचंड दुष्काळ असताना व शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या आणेवारीने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेसच्या आंदोलनानंतर शासनाला निर्णय बदलावा लागला. पण हा निर्णय घेताना वणी, मारेगाव, आर्णी, पुसद, केळापूर, घाटंजी, राळेगाव व झरी या तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांच्यावर दाखविण्यात आली. हा या तालुक्यांवर अन्याय असल्याचे शिवाजीराव मोघे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या आठही अन्यायग्रस्त तालुक्यात पुन्हा काळजीपूर्वक पीक पाहणी करून आणेवारी घोषित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)