शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नव्या राष्ट्रीय महामार्गात अमरावती-यवतमाळवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 11:20 IST

मेळघाट-करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजुरीच्या वाटेवर असला तरी यात अमरावती-यवतमाळच्या प्रवासावर अन्याय होणार आहे. कारण एवढाच मार्ग दुपदरी असून उर्वरित सर्व मार्ग चौपदरी आहे.

ठळक मुद्देमार्ग केवळ दुपदरी मेळघाट ते करंजी मंजुरीच्या वाटेवरदोन हजार कोटींचे बजेट३१५ किलोमीटरची लांबी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मेळघाट-करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजुरीच्या वाटेवर असला तरी यात अमरावती-यवतमाळच्या प्रवासावर अन्याय होणार आहे. कारण एवढाच मार्ग दुपदरी असून उर्वरित सर्व मार्ग चौपदरी आहे. त्यामुळेच अमरावती-यवतमाळ हा मार्गसुद्धा चौपदरी करण्याची जोरदार मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होत आहे.मेळघाटातील हा राष्ट्रीय महामार्ग मध्यप्रदेश सीमेपासून सुरू होणार आहे. परतवाडा-आसेगाव-अमरावती-नांदगाव खंडेश्वर-नेर-यवतमाळ-करंजी पर्यंत राहणार आहे. या रस्त्याच्या माध्यमातून अमरावती-यवतमाळ हे जिल्हे आणखी वेगानरीत्या जोडले जाणार आहेत. मध्यप्रदेशातील वाहनांना तेलंगणा-आंध्रप्रदेश तसेच मराठवाड्यात जाण्यासाठी हा मार्ग उपयोगी ठरणार आहे.यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर ‘कनेक्टीव्हीटी’ निर्माण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गासाठी काम सुरू आहे. आता हा महामार्ग दिल्लीत मंजुरीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

कुठे चौपदरी, कुठे दुपदरी३१५ किलोमीटर लांबी असलेल्या या महामार्गाचे बजेट सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे राहणार आहे. अमरावती ते परतवाडा आणि यवतमाळ ते करंजी (ता. पांढरकवडा जि. यवतमाळ) हा मार्ग चौपदरी तर अमरावती ते यवतमाळ हा दोन पदरी राहणार आहे.या दोन पदरी रस्त्यासाठी प्रवासी वाहतूक कमी असणे हे कारण सांगितले जात आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या संपूर्ण मार्गावरच वाहतूक वाढणार एवढे निश्चित. मग अमरावती-यवतमाळ एवढाच रस्ता दुपदरी का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दुपदरी मार्गामुळेच चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचा उद्देश सफल होणार नाही, असे मानले जाते.कारण या दुपदरी मार्गावर वाहनांची गती पुन्हा मंदावणार आहे. म्हणूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मेळघाटपासून करंजीपर्यंत सरसकट संपूर्ण महामार्गच चौपदरी करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

सहा ठिकाणी बायपासधारणी, परतवाडा, आसेगाव पूर्णा, अमरावती, नेर, यवतमाळ येथे या महामार्गावर बायपास राहणार आहे. बायपास संपणाऱ्या प्रत्येक ठिकाणी छोटा पूल राहणार आहे.

नांदगाव खंडेश्वरला उड्डाण पूलनांदगाव खंडेश्वर येथे उड्डाण पूल तर अमरावती-परतवाडा रोडवरील पेढी नदी येथे नवा पूल बांधला जाणार आहे. कारण तेथील पूल हा ११० वर्षे जुना आहे. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूने हा बायपास व पूल राहणार असल्याचे सांगितले जाते. नेरमध्ये अमरावतीवरून यवतमाळकडे येताना डाव्या बाजूने बायपास राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा नियोजित बायपास आहे. दिल्लीतून या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळताच भूसंपादन प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणालादुपदरी मार्गाच्या या प्रकरणात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार व राजकीय नेत्यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

टॅग्स :National Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6