शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी-केळापूर मतदार संघात उद्योगांची वानवा

By admin | Updated: December 1, 2015 06:41 IST

आदिवासीबहुल आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्रात मागासलेपणाच्या खुना अद्यापही कायमच आहे. या मतदार संघात एकही

नरेश मानकर ल्ल पांढरकवडाआदिवासीबहुल आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्रात मागासलेपणाच्या खुना अद्यापही कायमच आहे. या मतदार संघात एकही मोठा उद्योग येऊ शकला नाही. पांढरकवडा येथील वसंत सहकारी सूत गिरणी तर कित्येक वर्षांपासून बंद पडली आहे. ही सूतगिरणी सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कोणतेही प्रयत्न केले नाही. पांढरकवडा येथील ५०० ते ६०० बेरोजगारांना रोजगार देणारी सूतगिरणी गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडली आहे. ती बंद पडल्यापासून इतर कोणताही लहान-मोठा उद्योग या मतदार संघात आला नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकतरी मोठा उद्योग या भागात यावा, अशी या भागातील जनतेची रास्त मागणी आहे. आदिवासीबहुल मतदार संघ असूनही या भागात एमआयडीसी सुरू होऊ शकली नाही. अनेक बेरोजगारांच्या हातांना काम देणारा उद्योग, या भागात सुरू होऊ शकला नाही. आदिवासीबहुल असलेल्या या भागात विकासाला खूप वाव आहे. नवीन प्रकल्प, योजना कार्यान्वीत करण्यासाठी या ठिकाणी अनेक संधी आहेत. अनेक समस्या, अनेक प्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटलेले नाहीत. विशेषत: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न तसाच कायम आहे. लांब धाग्याचा कापूस पिकविणारा भाग म्हणून या भागाची ओळख आहे. परंतु पांढरे सोने पिकविणारा शेतकरीच उपेक्षित आहे. कापसावर प्रक्रिया करणारा एखादा मोठा उद्योग या भागात आल्यास, या भागासाठी त्याचा चांगला फायदा निश्चितच होणार आहे. सिंचनाचा अभाव या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. सायखेड सिंचन प्रकल्पासारखे प्रकल्प या भागात आहे. परंतु या प्रकल्पाचे पाणीच शेतकऱ्यांना शेवटच्या टोकापर्यंत मिळत नाही. कॅनल ठिकठिकाणी फुटले आहे. कित्येक वर्षांपासून प्रकल्पात गाळ साचून आहे. पण याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांची हीच स्थिती आहे. आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासनाने पांढरकवडा येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची निर्मिती केली. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी मिळतो. परंतु आदिवासींना खऱ्या अर्थाने काहीच मिळत नाही. काँग्रेसचे सरकार जाऊन आता युतीचे सरकार आले आहे. त्याला एक वर्ष होऊन गेले. तथापि या भागातील अनेक समस्या अद्यापही कायमच आहे.निम्न पैनगंगा प्रकल्प रखडलेलाचयवतमाळ जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्हा व तेलंगणातील ५ लाख ६७ हजार एकर जमीन निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे सिंचनाखाली येणार आहे. या भागासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी येणाऱ्या सर्व शासकीय, प्रशासकीय, न्यायालयीन अडचणी आता दूर झाल्या. मात्र या प्रकल्पाचे रखडलेले काम अद्यापही सुरू झाले नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा परिसर निश्चित सुजलाम सुफलाम होणार आहे. प्रकल्पाचा सुरूवातीचा खर्च केवळ १४०२ कोटी रूपयांचा होता. त्यानंतर १९९७ मध्ये हा खर्च १० हजार ४२९ कोटींवर गेला. सध्या या प्रकल्पाचा खर्च १७ हजार कोटींवर गेला आहे. १९९७ मध्ये शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली होती. मान्यता मिळून १८ वर्ष झाल्यानंतरही या प्रकल्पाचे काम रखडले आहे. तत्कालीन युती शासनाला पाठिंबा देणारे त्यावेळचे अपक्ष आमदार शिवाजीराव मोघे यांनी प्रयत्न करून या प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून मान्यता मिळविली होती. विशेष म्हणजे आतासुद्धा युतीचे शासन आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे. कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी या भागातील जनतेची मागणी आहे.