शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

आर्णी-केळापूर मतदार संघात उद्योगांची वानवा

By admin | Updated: December 1, 2015 06:41 IST

आदिवासीबहुल आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्रात मागासलेपणाच्या खुना अद्यापही कायमच आहे. या मतदार संघात एकही

नरेश मानकर ल्ल पांढरकवडाआदिवासीबहुल आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्रात मागासलेपणाच्या खुना अद्यापही कायमच आहे. या मतदार संघात एकही मोठा उद्योग येऊ शकला नाही. पांढरकवडा येथील वसंत सहकारी सूत गिरणी तर कित्येक वर्षांपासून बंद पडली आहे. ही सूतगिरणी सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कोणतेही प्रयत्न केले नाही. पांढरकवडा येथील ५०० ते ६०० बेरोजगारांना रोजगार देणारी सूतगिरणी गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडली आहे. ती बंद पडल्यापासून इतर कोणताही लहान-मोठा उद्योग या मतदार संघात आला नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकतरी मोठा उद्योग या भागात यावा, अशी या भागातील जनतेची रास्त मागणी आहे. आदिवासीबहुल मतदार संघ असूनही या भागात एमआयडीसी सुरू होऊ शकली नाही. अनेक बेरोजगारांच्या हातांना काम देणारा उद्योग, या भागात सुरू होऊ शकला नाही. आदिवासीबहुल असलेल्या या भागात विकासाला खूप वाव आहे. नवीन प्रकल्प, योजना कार्यान्वीत करण्यासाठी या ठिकाणी अनेक संधी आहेत. अनेक समस्या, अनेक प्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटलेले नाहीत. विशेषत: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न तसाच कायम आहे. लांब धाग्याचा कापूस पिकविणारा भाग म्हणून या भागाची ओळख आहे. परंतु पांढरे सोने पिकविणारा शेतकरीच उपेक्षित आहे. कापसावर प्रक्रिया करणारा एखादा मोठा उद्योग या भागात आल्यास, या भागासाठी त्याचा चांगला फायदा निश्चितच होणार आहे. सिंचनाचा अभाव या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. सायखेड सिंचन प्रकल्पासारखे प्रकल्प या भागात आहे. परंतु या प्रकल्पाचे पाणीच शेतकऱ्यांना शेवटच्या टोकापर्यंत मिळत नाही. कॅनल ठिकठिकाणी फुटले आहे. कित्येक वर्षांपासून प्रकल्पात गाळ साचून आहे. पण याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांची हीच स्थिती आहे. आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासनाने पांढरकवडा येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची निर्मिती केली. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी मिळतो. परंतु आदिवासींना खऱ्या अर्थाने काहीच मिळत नाही. काँग्रेसचे सरकार जाऊन आता युतीचे सरकार आले आहे. त्याला एक वर्ष होऊन गेले. तथापि या भागातील अनेक समस्या अद्यापही कायमच आहे.निम्न पैनगंगा प्रकल्प रखडलेलाचयवतमाळ जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्हा व तेलंगणातील ५ लाख ६७ हजार एकर जमीन निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे सिंचनाखाली येणार आहे. या भागासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी येणाऱ्या सर्व शासकीय, प्रशासकीय, न्यायालयीन अडचणी आता दूर झाल्या. मात्र या प्रकल्पाचे रखडलेले काम अद्यापही सुरू झाले नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा परिसर निश्चित सुजलाम सुफलाम होणार आहे. प्रकल्पाचा सुरूवातीचा खर्च केवळ १४०२ कोटी रूपयांचा होता. त्यानंतर १९९७ मध्ये हा खर्च १० हजार ४२९ कोटींवर गेला. सध्या या प्रकल्पाचा खर्च १७ हजार कोटींवर गेला आहे. १९९७ मध्ये शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली होती. मान्यता मिळून १८ वर्ष झाल्यानंतरही या प्रकल्पाचे काम रखडले आहे. तत्कालीन युती शासनाला पाठिंबा देणारे त्यावेळचे अपक्ष आमदार शिवाजीराव मोघे यांनी प्रयत्न करून या प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून मान्यता मिळविली होती. विशेष म्हणजे आतासुद्धा युतीचे शासन आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे. कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी या भागातील जनतेची मागणी आहे.