शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

उद्योगांना परवानगी पण मजूर, कच्चामाल, वाहतुकीची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

यवतमाळच्या एमआयडीसीत भूखंड खरेदी केलेल्या २५० उद्योजकांची नोंद आहे. त्यापैकी १३० भूखंडावर प्रत्यक्ष उद्योग उभारले गेले. लॉकडाऊनपूर्वी यातील ६० ते ७० उद्योग सुरू होते. लॉकडाऊनच्या काळात फुड, बेकरी, कृषीवर आधारित, दालमिल, जिनिंग-प्रेसिंग या सारखे अत्यावश्यक सेवेतील उद्योग तेवढे सुरू होते. परंतु आता प्रशासनाने इतरही उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे.

ठळक मुद्दे‘एमआयडीसी’त सव्वाशे उद्योग : केवळ फूड, जिनिंग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रशासनाने लॉकडाऊनमुळे बंद पडलेले एमआयडीसीतील उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली असली तरी उद्योजकांना मजूर, कच्चामाल, वाहनांची परवानगी अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.यवतमाळच्या एमआयडीसीत भूखंड खरेदी केलेल्या २५० उद्योजकांची नोंद आहे. त्यापैकी १३० भूखंडावर प्रत्यक्ष उद्योग उभारले गेले. लॉकडाऊनपूर्वी यातील ६० ते ७० उद्योग सुरू होते. लॉकडाऊनच्या काळात फुड, बेकरी, कृषीवर आधारित, दालमिल, जिनिंग-प्रेसिंग या सारखे अत्यावश्यक सेवेतील उद्योग तेवढे सुरू होते. परंतु आता प्रशासनाने इतरही उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळीच येथील एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना उद्योग सुरू करण्याच्या सूचना उद्योजकांना देण्याचे निर्देश दिले. मास्क वाटप, सॅनिटायझरींग, सोशल डिस्टन्सिंग अशा अटींवर हे उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. एमआयडीसीने पोर्टल विकसित केले असून त्यावर आॅनलाईन पद्धतीने ही परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी उद्योजकाला कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून करावयाच्या आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची हमी द्यावी लागणार आहे.प्रशासनाने लॉकडाऊन काळातही उद्योग सुरू करण्याची मुभा दिली असली तरी लगेच उद्योजकांना कारखाने सुरू करण्यात अडचणी येत आहेत. कुशल व अकुशल कारागीर-मजुरांची टंचाई ही प्रमुख समस्या उद्योजकांपुढे आहे. शिवाय कच्चामाल मिळविणे, तयार मालाची वाहतूक करणे या समस्याही कायम आहेत. आरटीओकडून माल वाहतुकीच्या परवानगी दिल्या जातात. त्या तातडीने मिळाव्या अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. त्यामुळे तयार माल बाहेर जिल्ह्यात, राज्यात पाठविण्याची अडचण दूर होईल. रेमण्ड सारखा उद्योग सध्या बंद आहे. आधीच तयार असलेला माल पडून आहे. मालाला उठाव नसणे ही प्रमुख समस्या आहे. रेमण्डचा माल निर्यात होतो, त्यासाठी हा माल मुंबईत कोस्टलपर्यंत पोहोचवायचा कसा याची अडचण आहे. आधीचाच तयार माल पडून असताना पुन्हा उत्पादन करायचे कसे ही समस्या आहे. त्यातही तीन शिप्ट असल्याने कोरोनाची दक्षता घेण्याचे आव्हान वेगळेच.लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योगांना कारखाने सुरू करण्याची मुभा प्रशासनाकडून दिली जाणार आहे. सशर्त आॅनलाईन परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योजकांनी पुढे येणे गरजेचे आहे.- हेमंत कुळकर्णी, उपअभियंता, एमआयडीसी यवतमाळ.उद्योग सुरू करण्यास अनेक अडचणी आहे. उद्योग सुरू झाल्यानंतर कोरोनाचा रुग्ण सापडल्यास थेट एफआयआर होणार असल्याने उद्योजक कारखाने सुरू करण्यास धजावत नाहीत. नियम-कायदे कठीण असल्याने शिवाय मजूर, कच्चामाल, वाहतूक परवानगी या अडचणी असल्याने उद्योग सुरू करणे आव्हानच आहे.- आनंद भुसारी, सचिव, एमआयडीसी असोसिएशन, यवतमाळ.

टॅग्स :MIDCएमआयडीसी