शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

भारत देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: April 11, 2016 02:35 IST

सद्यस्थितीत आपला देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो कधी कोलमडून पडेल हे काहीही सांगता येणार नाही.

रावसाहेब कसबे : समता पर्वात मार्गदर्शन, चित्र प्रदर्शनाचे उद्घाटनयवतमाळ : सद्यस्थितीत आपला देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो कधी कोलमडून पडेल हे काहीही सांगता येणार नाही. ‘मनुस्मृती’ आणि ‘भगवद् गीता’ या जुळ्या बहिणी आहेत. समाजात दुही माजविणाऱ्या या ग्रंथांना कदापि राष्ट्रीय ग्रंथाचा मान देता येणार नाही, असे विचार डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे मांडले. समता प्रतिष्ठान यवतमाळच्या विद्यमाने समता मैदानात आयोजित महात्मा फुले-डॉ. आंबेडकर समता पर्वात ते बोलत होते. यावेळी समता मंचावर ‘एक क्षण गौरवाचा’ या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विचारवंत डॉ. अशोक पळवेकर होते. अतिथी म्हणून समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखडे, सचिव अनिल रामजी आडे, मार्गदर्शक दीपक नगराळे, प्राचार्य आनंद ठमके, अ‍ॅड. दिंडीलता कांबळे, अ‍ॅड. मिलिंद भगत, प्रा. बाळकृष्ण सरकटे, लॉर्ड बुद्धाचे के.एस. नाईक आदी उपस्थित होते. इ.स.च्या दुसऱ्या शतकापासून हा देश कसा जगला हे नमूद करताना डॉ. कसबे म्हणाले, आर्य, हुन, फ्रेंच, तुर्की, ब्रिटिश देशात आले. त्यांचे आपण स्वागतच केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, भारताचा इतिहास पारतंत्र्याचा, पराजयाचा, अपमानाचा इतिहास आहे. जोपर्यंत जात नष्ट होत नाही तोपर्यंत हा देश राष्ट्र होण्याची कोणतीही शक्यता नाही. बाबासाहेब हे जगातील सर्व शोषित समुहाचे नेते झाले आहेत. त्यांना हे जग कसे घडवायचे होते हे सत्य अधोरेखित करण्याची १२५ वी जयंती हाच योग्य मुहूर्त असल्याचे ते म्हणाले. डॉ. अशोक पळवेकर यांनी, सामाजिक नीतीचा धम्म अस्तित्वात येण्यासाठी डॉ. कसबे यांचे विचार-मांडणी पुढे नेण्याची भूमिका चळवळीला अदा करावी लागेल, असे मत व्यक्त केले. प्रारंभी निशा तिरपुडे हिने नृत्य सादर केले. यानंतर शेखर वांढरे यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कथाकार हेमंत थोरात यांच्या ‘इत्यर्थ’ व प्रा. सिद्धार्थ भगत यांच्या ‘कळ कोवळी उठू दे’ गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संचालन प्रा. अंकुश वाकडे, परिचय एन.यू. धांदे यांनी, तर आभार सिद्धार्थ मानकर यांनी मानले. (वार्ताहर)