शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

भारत देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: April 11, 2016 02:35 IST

सद्यस्थितीत आपला देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो कधी कोलमडून पडेल हे काहीही सांगता येणार नाही.

रावसाहेब कसबे : समता पर्वात मार्गदर्शन, चित्र प्रदर्शनाचे उद्घाटनयवतमाळ : सद्यस्थितीत आपला देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो कधी कोलमडून पडेल हे काहीही सांगता येणार नाही. ‘मनुस्मृती’ आणि ‘भगवद् गीता’ या जुळ्या बहिणी आहेत. समाजात दुही माजविणाऱ्या या ग्रंथांना कदापि राष्ट्रीय ग्रंथाचा मान देता येणार नाही, असे विचार डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे मांडले. समता प्रतिष्ठान यवतमाळच्या विद्यमाने समता मैदानात आयोजित महात्मा फुले-डॉ. आंबेडकर समता पर्वात ते बोलत होते. यावेळी समता मंचावर ‘एक क्षण गौरवाचा’ या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विचारवंत डॉ. अशोक पळवेकर होते. अतिथी म्हणून समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखडे, सचिव अनिल रामजी आडे, मार्गदर्शक दीपक नगराळे, प्राचार्य आनंद ठमके, अ‍ॅड. दिंडीलता कांबळे, अ‍ॅड. मिलिंद भगत, प्रा. बाळकृष्ण सरकटे, लॉर्ड बुद्धाचे के.एस. नाईक आदी उपस्थित होते. इ.स.च्या दुसऱ्या शतकापासून हा देश कसा जगला हे नमूद करताना डॉ. कसबे म्हणाले, आर्य, हुन, फ्रेंच, तुर्की, ब्रिटिश देशात आले. त्यांचे आपण स्वागतच केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, भारताचा इतिहास पारतंत्र्याचा, पराजयाचा, अपमानाचा इतिहास आहे. जोपर्यंत जात नष्ट होत नाही तोपर्यंत हा देश राष्ट्र होण्याची कोणतीही शक्यता नाही. बाबासाहेब हे जगातील सर्व शोषित समुहाचे नेते झाले आहेत. त्यांना हे जग कसे घडवायचे होते हे सत्य अधोरेखित करण्याची १२५ वी जयंती हाच योग्य मुहूर्त असल्याचे ते म्हणाले. डॉ. अशोक पळवेकर यांनी, सामाजिक नीतीचा धम्म अस्तित्वात येण्यासाठी डॉ. कसबे यांचे विचार-मांडणी पुढे नेण्याची भूमिका चळवळीला अदा करावी लागेल, असे मत व्यक्त केले. प्रारंभी निशा तिरपुडे हिने नृत्य सादर केले. यानंतर शेखर वांढरे यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कथाकार हेमंत थोरात यांच्या ‘इत्यर्थ’ व प्रा. सिद्धार्थ भगत यांच्या ‘कळ कोवळी उठू दे’ गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संचालन प्रा. अंकुश वाकडे, परिचय एन.यू. धांदे यांनी, तर आभार सिद्धार्थ मानकर यांनी मानले. (वार्ताहर)