शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दाभडीच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा

By admin | Updated: March 24, 2015 01:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने चर्चेत आलेल्या दाभडी गावाच्या विकासासाठी

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : ग्रामसभेत १०८ ठराव मंजूर, ५० कोटींचे बजेट, महसूल विभागांतर्गत समस्यांचा अंतर्भावहरिओम बघेल  आर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने चर्चेत आलेल्या दाभडी गावाच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. २० मार्च २०१४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णी तालुक्याच्या दाभडी गावातून मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्या दिवसाची यंदाच्या २० मार्चला आठवण करून देत काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ हा कार्यक्रम दाभडीत आयोजित केला. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या कायम असल्याचे सांगत काँग्रेसने काळा चहा वाटून भाजपाचा निषेध केला. दाभडीच्या आडोशाने माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि काँग्रेसने मोदी व भाजपाला टार्गेट केल्याचे पाहून आता राज्यातील भाजपा सरकारनेही काँग्रेसला प्रतिउत्तर देण्याचे ठरविले आहे. रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दाभडी गावातील विकासाच्या अनुषंगाने यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्याशी चर्चा झाली. दाभडी गावाच्या सर्वांगीण विकासाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना ना. फडणवीस यांनी येरावार यांना दिल्या. या आराखड्यासाठी कितीही निधी लागला तरी चालेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते. आमदार येरावार यांनी मुख्यमंत्र्यांचा हा संदेश दाभडी गावचे सरपंच संतोष टाके, सदस्य प्रकाश राऊत यांच्याकडे पोहोचविला. गेल्या साडेचार वर्षांपासून सरपंच असलेल्या टाके यांना दाभडीतील समस्यांची चांगली जाण आहे. त्यांनी लगेच रविवारी सायंकाळीच दाभडीत ग्रामसभा बोलविण्याचे सूचविले. थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने दाभडीला विकासाची संधी चालून आली आहे. त्यामुळे पक्षभेद व राजकारण विसरुन गावाच्या विकासासाठी एकजूट व्हा, गावाला काय पाहिजे ते सांगा, नेमका कशाचा विकास हवा आहे ते मांडा, गावाला स्वयंपूर्ण करा असे आवाहन या ग्रामसभेत करण्यात आले. गावकऱ्यांच्या अपेक्षा ऐकून घेतल्यानंतर विकास कामांचे तब्बल १०८ ठराव एकमताने या ग्रामसभेत मंजूर करण्यात आले. या ठरावांसह दाभडीचा सुमारे ५० कोटींचे बजेट असलेला विकास आराखडा सोमवारी तयार करून आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना सादर करण्यात आला. हा अहवाल घेऊन येरावार स्वत: मुंबईला जाणार आहेत. दाभडीचे सरपंच संतोष टाके आजारी आहेत. त्यानंतरही त्यांची विकास आराखड्यासाठी धडपड सुरू होती. या विकास आराखड्यात शेतकऱ्यांच्या समस्या, अंतर्गत रस्ते, सांडपाणी, नळ योजना, बँक, आरोग्य केंद्र, शेततळ्यातील गाळ उपसणे, पांदण रस्ते, शिक्षण, महसूल विभागाच्या समस्यांचा अंतर्भाव करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.