शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

दाभडीच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा

By admin | Updated: March 24, 2015 01:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने चर्चेत आलेल्या दाभडी गावाच्या विकासासाठी

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : ग्रामसभेत १०८ ठराव मंजूर, ५० कोटींचे बजेट, महसूल विभागांतर्गत समस्यांचा अंतर्भावहरिओम बघेल  आर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने चर्चेत आलेल्या दाभडी गावाच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. २० मार्च २०१४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णी तालुक्याच्या दाभडी गावातून मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्या दिवसाची यंदाच्या २० मार्चला आठवण करून देत काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ हा कार्यक्रम दाभडीत आयोजित केला. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या कायम असल्याचे सांगत काँग्रेसने काळा चहा वाटून भाजपाचा निषेध केला. दाभडीच्या आडोशाने माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि काँग्रेसने मोदी व भाजपाला टार्गेट केल्याचे पाहून आता राज्यातील भाजपा सरकारनेही काँग्रेसला प्रतिउत्तर देण्याचे ठरविले आहे. रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दाभडी गावातील विकासाच्या अनुषंगाने यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्याशी चर्चा झाली. दाभडी गावाच्या सर्वांगीण विकासाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना ना. फडणवीस यांनी येरावार यांना दिल्या. या आराखड्यासाठी कितीही निधी लागला तरी चालेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते. आमदार येरावार यांनी मुख्यमंत्र्यांचा हा संदेश दाभडी गावचे सरपंच संतोष टाके, सदस्य प्रकाश राऊत यांच्याकडे पोहोचविला. गेल्या साडेचार वर्षांपासून सरपंच असलेल्या टाके यांना दाभडीतील समस्यांची चांगली जाण आहे. त्यांनी लगेच रविवारी सायंकाळीच दाभडीत ग्रामसभा बोलविण्याचे सूचविले. थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने दाभडीला विकासाची संधी चालून आली आहे. त्यामुळे पक्षभेद व राजकारण विसरुन गावाच्या विकासासाठी एकजूट व्हा, गावाला काय पाहिजे ते सांगा, नेमका कशाचा विकास हवा आहे ते मांडा, गावाला स्वयंपूर्ण करा असे आवाहन या ग्रामसभेत करण्यात आले. गावकऱ्यांच्या अपेक्षा ऐकून घेतल्यानंतर विकास कामांचे तब्बल १०८ ठराव एकमताने या ग्रामसभेत मंजूर करण्यात आले. या ठरावांसह दाभडीचा सुमारे ५० कोटींचे बजेट असलेला विकास आराखडा सोमवारी तयार करून आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना सादर करण्यात आला. हा अहवाल घेऊन येरावार स्वत: मुंबईला जाणार आहेत. दाभडीचे सरपंच संतोष टाके आजारी आहेत. त्यानंतरही त्यांची विकास आराखड्यासाठी धडपड सुरू होती. या विकास आराखड्यात शेतकऱ्यांच्या समस्या, अंतर्गत रस्ते, सांडपाणी, नळ योजना, बँक, आरोग्य केंद्र, शेततळ्यातील गाळ उपसणे, पांदण रस्ते, शिक्षण, महसूल विभागाच्या समस्यांचा अंतर्भाव करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.