शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

एसटीच्या यवतमाळ विभागाची उत्पन्नाची बाजू होतेय कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

उत्पन्न नसल्याने एसटीला मागील मार्च महिन्यापासून मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. अलीकडे काही महिन्यांत ही बाजू सुधारत असतानाच नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरून अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीचे प्रवासी ओढून नेत आहेत. सकाळच्या वेळी इतर खासगी वाहनांचीही या ठिकाणी गर्दी होते. २०० मीटरच्या आतच ही वाहने उभी करून बस स्थानकातून प्रवासी घेऊन जातात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमधील सूर : ठोस उपाययोजना हव्या, बसेस धावतात रिकाम्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील उत्पन्नाची बाजू कमकुवत होत असल्याचा कर्मचाऱ्यांचा सूर आहे. बसफेऱ्यांचे चुकत असलेले नियोजन, प्रवाशांचा खासगी वाहनांकडे वाढत चाललेला कल, अधिकाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष आदी बाबी याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. राहात असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात नसल्याची ओरड होत आहे. अनेक मार्गांवरील बसफेऱ्या अक्षरश: दोन ते चार प्रवासी घेऊन धावतात. प्रत्येक पाच मिनिटांनंतर प्रामुख्याने अमरावती, नागपूर मार्गावर बसेस सोडल्या जातात. स्थानिकसह बाहेर आगाराच्या बसेसचीही त्यामध्ये भर पडते. याच बसफेऱ्या काही अंतराने सोडल्यास प्रवाशांच्या सोयीचे होईल. शिवाय महामंडळाला अधिक प्रवासी मिळून उत्पन्नात भर पडेल. सकाळी प्रवासी संख्या कमी असते. अशावेळी थोड्या अंतराने बसेस सोडणे अपेक्षित आहे. उत्पन्न नसल्याने एसटीला मागील मार्च महिन्यापासून मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. अलीकडे काही महिन्यांत ही बाजू सुधारत असतानाच नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरून अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीचे प्रवासी ओढून नेत आहेत. सकाळच्या वेळी इतर खासगी वाहनांचीही या ठिकाणी गर्दी होते. २०० मीटरच्या आतच ही वाहने उभी करून बस स्थानकातून प्रवासी घेऊन जातात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. जिल्ह्यातील जवळपास आगारांमध्ये अशीच काहिशी परिस्थिती आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालनही अपवादानेच होते. प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी सुचविलेल्या उपाययोजना केल्या जात नाहीत. बसची योग्य स्वच्छता होत नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालनही केले जात नाही. एसटी बसेस शॅम्पू, सोड्याने धुण्याचा घेण्यात आलेला निर्णयही यवतमाळ विभागात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. आगार प्रमुखांनी या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून त्या करून घेण्याची अपेक्षा आहे. यातील काही अधिकारी गंभीर नसल्याची ओरड होत आहे.

अखेर ‘त्या’ फेरीला एक पैसाही उत्पन्न नाहीयवतमाळ आगारातील जितेंद्र पाटील या वाहकाने एसटीचे उत्पन्न कमी होण्यामागील स्वानुभव तक्रारीद्वारे विभाग नियंत्रकांकडे मांडले. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना बरीच घासाघीस झाल्यानंतर अमरावती मुक्कामी कामगिरी मिळाली. यासाठी अडीच ते तीन तास उशिराने बस मिळाली. त्या वेळी ७० ते ८० प्रवासी या बसला मिळाले. अवघ्या काही मिनिटांत बस सुटणार होती. तेवढ्यातच पाटील यांना बाभूळगावपर्यंत जाण्याचा आदेश देण्यात आला. आता बस सुटण्यास विलंब होईल, असे वाटल्याने अमरावती बसमधील प्रवासी उतरून गेले. पाटील यांना यवतमाळ-बाभूळगाव बसचे उत्पन्न केवळ १२० रुपये मिळाले. बाभूळगावहून यवतमाळ येताना शून्य उत्पन्न झाले. यात महामंडळाचे आठ ते नऊ हजार रुपयांचे नुकसान झाले. जाणीवपूर्वक कामगिरी बदलविण्याचा संबंधित अधिकाऱ्याने केलेला प्रकार यामुळे महामंडळाचे नुकसान होण्यासोबतच जनमाणसात एसटीची प्रतिमा मलीन झाली. यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे.

 

टॅग्स :state transportएसटी