शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोस्वीचमुळे रोहित्र जळण्याच्या घटना

By admin | Updated: October 22, 2016 01:44 IST

महावितरणकडून पुरविल्या जाणाऱ्या विजेच्या येण्याचा व जाण्याचा निश्चित वेळ नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते.

महावितरणचा दावा : अखंडित वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहनयवतमाळ : महावितरणकडून पुरविल्या जाणाऱ्या विजेच्या येण्याचा व जाण्याचा निश्चित वेळ नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण कृषिपंपांनाच आॅटो स्वीच लावतात. परंतु या यंत्रणेमुळे रोहित्रावरील भार वाढून ते जळण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा महावितरणने केला आहे. अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅटो स्वीचचा वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत एक लाखाच्या घरात कृषिपंपधारक शेतकरी आहे. तर राज्यात सुमारे ३९ लाख कृषिपंपधारक आहेत. महावितरणकडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा देण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जावून कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कृषिपंपांनाच आॅटो स्वीच लावले आहे. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. ही बाब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना आॅटो स्वीच लावू नये, तसेच काही शेतकऱ्यांनी ते लावले असल्यास काढून टाकण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. यामुळे रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी होईल व शेतकऱ्यांना योग्य दाबाचा अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल आणि शेतकऱ्यांना सोयीचे जाईल, असेही वीज कंपनीने म्हटले आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. जेणेकरून त्यांना त्यांच्या पिकांना नियमितपणे पाणी देता येईल, असे आवाहन वीज कंपनीने केले आहे. (प्रतिनिधी)वीज बचतीसाठी कपॅसिटर बसवावेकृषिपंपधारक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला कपॅसिटर बसवावे. यामुळे वीज बचत होवून पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळतो. तसेच कृषिपंप जळण्याचे प्रमाणही कमी होते. रोहित्रांवरील भार ३० टक्क्याने कमी होवून रोहित्र जळण्याचेही प्रमाण कमी होते. या सर्वांचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कपॅसिटरचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.