शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

महागावात बौद्ध ऐक्य परिषदेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:15 IST

समाजाला अजूनही चांगल्या विचाराची गरज असून नव्या पिढीला धम्म सांगताना हजारो वर्षांचा तोच तो विचार सांगण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक विचार त्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड-वघाळाच्या महापौर शिलाताई किशोर भवरे यांनी केले.

ठळक मुद्देशीलाताई भवरे : समाजाला चांगल्या विचारांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : समाजाला अजूनही चांगल्या विचाराची गरज असून नव्या पिढीला धम्म सांगताना हजारो वर्षांचा तोच तो विचार सांगण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक विचार त्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड-वघाळाच्या महापौर शिलाताई किशोर भवरे यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात शनिवारी बौद्ध ऐक्य परिषदेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आपण शिकले पाहिजे. सोबतच चांगले संस्कार आत्मसात केले पाहिजे. तरच आपण धम्माचे सार्थक करू. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची कास धरून समाजाला सत्तेच्या माध्यमातून परिवर्तनाच्या दिशेला नेण्याचे आवाहन त्यांनी केले. गोकुळ वंजारे यांच्या अध्यक्षतेखाली, नालंदा भरणे, किशोर भवरे, अंबादास भगत, प्रा.दीपक वाघमारे, प्रकाश मनवर, सतीश खाडे यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले.शनिवारी सकाळी पहिल्या सत्रापूर्वी भन्ते धम्मसेवकजी यांच्याहस्ते धम्म ध्वजारोहण आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बौद्ध ऐक्य परिषदेचा रविवार १४ जानोरीला समारोप होणार आहे. या परिषदेसाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील समाजबांधव येथे दाखल झाले आहे.