शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

झरी तालुक्यात दूधच नाही, तर खवा येतो कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:23 IST

Yavatmal : भेसळयुक्त पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क मुकुटबन : सणवार आले की, भेसळीचा धंदा तेजीमध्ये येतो. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. सामान्य नागरिक बिनधास्तपणे गोड पदार्थ खरेदी करतात आणि सण साजरे करतात; परंतु भेसळयुक्त पदार्थामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, याची त्यांना कल्पना नसते. अन्न सुरक्षा व कायदा २००६ नियमन अन्वये कारवाई करण्यात यावी तसेच दूध, खव्यापासून बनविलेली मिठाई, पनीर, स्वीट, तूप, बटर व नमकीनचे नमुने तपासण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

सणाला गोड पदार्थांचीच सर्वत्र रेलचेल असते; परंतु गोड पदार्थ तयार करण्यासाठी जे दूध, खवा, मावा लागतो, त्याचे उत्पादन नेहमीप्रमाणेच असते. मग अचानक सणावाराला मागणीच्या तुलनेत पुरवठा कसा होणार? त्यामुळे मग भेसळ करून माल वाढविण्यात येतो. परिणामी तालुकावासीयांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजले असून अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे सणासुदीच्या काळात भेसळीचा धंदा जोरात सुरू आहे. एकीकडे दूध मिळणे कठीण झाले आहे. मग हे व्यावसायिक दुधापेक्षा कमी किमतीच्या पावडरचा वापर करून कृत्रिमरीत्या खवा बनवून त्यापासून मिठाई बनवतात. ही मिठाई आरोग्यासाठी घातक असून व्यावसायिक कोणत्या पदार्थापासून आपले उत्पादन बनवून विक्री करतात, याकडेसुद्धा अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अन्न व औषध प्रशासन या विभागामार्फत कोणत्याही प्रकारची तपासणीच होतच नसल्याचे वास्तव आहे. 

आदिलाबाद, पांढरकवडातून येते पाकिटाचे दूधझरी तालुक्यात दुधाची कमतरता असून मुबलक प्रमाणात गावरानी दूध मिळतच नाही. आदिलाबाद, पांढरकवडा व वणी येथून पाकीटमध्ये विविध कंपन्यांचे दूध झरी व मुकुटबनला येते. मुकुटबनला कोणत्याही हॉटेलात संध्याकाळी पाच वाजतानंतर दुधाचा चहा मिळत नाही. तसेच कोणत्याही हॉटेलात किवा स्वीट मार्टमध्ये कढईत दूध आटवून दुधापासून खवा, मावा बनवताना दिसून येत नाही. तरीपण येथे खव्यापासून बनवलेल्या अनेक मिठाईची खुलेआम विक्री होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ