शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

यवतमाळमध्ये ७९ धोकादायक इमारतीत विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 18:51 IST

प्रशासन बेफिकीर : ४३५ शाळांना हवाय दुरुस्तीचा उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शाळांचे जुने बांधकाम कालबाह्य झाल्याने इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्या इमारती पाडून बांधकाम करणे आवश्यक झाले आहे; मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने बांधकामास अडथळा येत आहे. परिणामी ७९ जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत अक्षरधडे गिरवावे लागत आहेत. पावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार १०३ शाळा आहेत. काही शाळांच्या इमारती तर ब्रिटिशकालीन आहेत. अनेक शाळांचे बांधकाम होऊन ३० ते ४० वर्षांचा कालावधी लोटला आहे. प्रशासनाने केलेल्या पाहणीत ७९ शाळांच्या इमारती पाडून त्याच ठिकाणी नव्याने बांधकाम करावे लागणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. काही ठिकाणी तर पालक विद्यार्थ्यांना धोकादायक अशा शाळेत पाठविण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे अंगणवाडी, समाजमंदिरात शाळांचे वर्ग भरविले जात आहेत. तर, शाळेच्या वन्हांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

२०२३-२४ मधील यू-डायसच्या माहितीनुसार तब्बल ४३५ शाळांवर दुरुस्तीचा उपचार करणे आवश्यक आहे; मात्र याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. नुकताच भंडारा जिल्ह्यात एका चिमुकलीचा शाळेत विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांना पाल्यांच्या जिवाची जास्तच काळजी वाटू लागली आहे. जीर्ण झालेल्या शाळेतील इलेक्ट्रिक वायरिंगदेखील खिळखिळी झाली आहे. भंडारा येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलण्याची मागणी जोर धरत आहे.

कोणत्या तालुक्यात किती धोकादायक इमारती तालुका                    संख्यावणी                            २७पुसद                           २४झरी                             ०२महागाव                        ०१ घाटंजी                          ०१उमरखेड                      ११दिग्रस                          ०३आर्णी                           ०१मारेगाव                        ०१

प्रस्तावात निघाल्या त्रुटी७९ शाळांच्या इमारती पाहून नवीन बांधण्यासंदर्भातचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानामधून वित्त विभागाकडे पाठविला होता; मात्र त्यात त्रुटी निघाल्याने प्रस्ताव परत पाठविण्यात आला आहे.

"नवीन शाळा बांधकाम व शाळा दुरुस्तीसाठी लागणाऱ्याा निधीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार आहे. सदर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे"- प्रकाश मिश्रा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. यवतमाळ

नियोजनच्या निधीवरच मदार२०२४-२५ या वर्षासाठी वार्षिक योजनेच्या निधीमधूनच शाळा बांध- कामासाठी तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. अजून नियोजनची सभा होऊ शकली नाही. बांधकामासाठी लागणाऱ्या निधीची मदार नियोजनवरच आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना लोकप्रतिनिधींकडे निधीसाठी आग्रह धरावा लागणार आहे.

तालुकानिहाय नादुरुस्त शाळा४३५ शाळांची दुरुस्ती करून त्या सुस्थितीत येऊ शकतात. आर्णी तालुक्यात दहा शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बाभूळगाव तालुक्यात १५, दारव्हा तालुक्यात २७, दिग्रस ११, घाटंजी ३४, कळंब ८, महागाव ५४, मारेगाव २०, नेर, १. पांढरकवडा २६. पुसद ४१. राळेगाव १५, उमरखेड ३३, वणी ४५, यवतमाळ ४३, झरी तालुक्यातील ४२ शाळांची दुरुस्ती प्रशासनाला करावी लागणार आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाYavatmalयवतमाळ