शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विदर्भात फेरफाराची १४ हजार प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 12:09 IST

शहरांचा विस्तार होण्यासोबतच मालमत्तांची संख्याही वाढली आहे. प्लॉटवरील घरांसह सदनिकांमधील गाळ्यांचा आलेख चढत गेला आहे. त्यामुळे नागरिकांची फेरफाराची मागणीही वाढली आहे.

ठळक मुद्देअमरावतीत पाच हजार, नागपुरात नऊ हजार अर्ज प्रलंबित

विलास गावंडे

यवतमाळ : विविध कारणांमुळे विदर्भात मालमत्तेच्या फेरफाराची १४ हजार ९५ प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर विभागात नऊ हजार ४००, तर अमरावती विभागात चार हजार ६९५ प्रकरणांना निकालाची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवरच विदर्भातील सर्व जिल्ह्यांत नगरभूमापन कार्यालयाची स्वतंत्र आस्थापना निर्माण करण्याची मागणी पुढे आली आहे.

शहरांचा विस्तार होण्यासोबतच मालमत्तांची संख्याही वाढली आहे. प्लॉटवरील घरांसह सदनिकांमधील गाळ्यांचा आलेख चढत गेला आहे. त्यामुळे नागरिकांची फेरफाराची मागणीही वाढली आहे. परंतु, भूमी अभिलेख विभागाकडून त्या तुलनेत मालमत्ताधारकांचे अर्ज निकाली निघत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यासह यंत्रणेत असलेले विविध दोष या बाबीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये परिरक्षण भूमापन (मेंटेन सर्व्हेअर) स्तरावर सहा हजार तर नगरभूमापन अधिकारी स्तरावर तीन हजार ४०० प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या विभागातील केवळ नागपूर शहरात नगरभूमापन अधिकाऱ्यांची तीन कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे २७ परिरक्षण भूमापक आहेत. शहराचा व्याप लक्षात घेता कार्यालय आणि कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्हे मिळून ४६९५ प्रकरणांना मार्गी लागण्याची प्रतीक्षा आहे. भूमी अभिलेख विभागात ही प्रकरणे पडून आहेत. विशेष म्हणजे, अमरावती विभागात एकही नगरभूमापन अधिकारी कार्यालय नाही. शहरी भागासाठी ही कार्यालये महत्त्वाची आहेत. अनेक शहरांमध्ये लगतची गावे समाविष्ट झाली आहेत. असे असतानाही ही कार्यालये सुरू करून मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रकरणे प्रलंबित राहात असल्याच्या कारणावरून परिरक्षण भूमापकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

दहा वर्षांपासून प्रस्ताव धूळखात

राज्यात नगरभूमापन कार्यालयाची स्वतंत्र आस्थापना निर्माण करण्यात यावी, असा प्रस्ताव सन २०११-१२ मध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांनी शासनाला पाठविला आहे. याला १२ वर्षांचा कालावधी लोटूनही कार्यवाही झालेली नाही.

स्वतंत्र नगरभूमापन कार्यालयाची आस्थापना निर्माण होणे अत्यावश्यक आहे. याशिवाय प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार नाही. कर्मचाऱ्यांवरही कारवाईची प्रकरणे वाढतील. त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे.

- श्रीराम खिरेकर, सरचिटणीस, भूमीअभिलेख कर्मचारी संघटना

टॅग्स :Courtन्यायालयVidarbhaविदर्भ