शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

विदर्भात फेरफाराची १४ हजार प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 12:09 IST

शहरांचा विस्तार होण्यासोबतच मालमत्तांची संख्याही वाढली आहे. प्लॉटवरील घरांसह सदनिकांमधील गाळ्यांचा आलेख चढत गेला आहे. त्यामुळे नागरिकांची फेरफाराची मागणीही वाढली आहे.

ठळक मुद्देअमरावतीत पाच हजार, नागपुरात नऊ हजार अर्ज प्रलंबित

विलास गावंडे

यवतमाळ : विविध कारणांमुळे विदर्भात मालमत्तेच्या फेरफाराची १४ हजार ९५ प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर विभागात नऊ हजार ४००, तर अमरावती विभागात चार हजार ६९५ प्रकरणांना निकालाची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवरच विदर्भातील सर्व जिल्ह्यांत नगरभूमापन कार्यालयाची स्वतंत्र आस्थापना निर्माण करण्याची मागणी पुढे आली आहे.

शहरांचा विस्तार होण्यासोबतच मालमत्तांची संख्याही वाढली आहे. प्लॉटवरील घरांसह सदनिकांमधील गाळ्यांचा आलेख चढत गेला आहे. त्यामुळे नागरिकांची फेरफाराची मागणीही वाढली आहे. परंतु, भूमी अभिलेख विभागाकडून त्या तुलनेत मालमत्ताधारकांचे अर्ज निकाली निघत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यासह यंत्रणेत असलेले विविध दोष या बाबीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये परिरक्षण भूमापन (मेंटेन सर्व्हेअर) स्तरावर सहा हजार तर नगरभूमापन अधिकारी स्तरावर तीन हजार ४०० प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या विभागातील केवळ नागपूर शहरात नगरभूमापन अधिकाऱ्यांची तीन कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे २७ परिरक्षण भूमापक आहेत. शहराचा व्याप लक्षात घेता कार्यालय आणि कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्हे मिळून ४६९५ प्रकरणांना मार्गी लागण्याची प्रतीक्षा आहे. भूमी अभिलेख विभागात ही प्रकरणे पडून आहेत. विशेष म्हणजे, अमरावती विभागात एकही नगरभूमापन अधिकारी कार्यालय नाही. शहरी भागासाठी ही कार्यालये महत्त्वाची आहेत. अनेक शहरांमध्ये लगतची गावे समाविष्ट झाली आहेत. असे असतानाही ही कार्यालये सुरू करून मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रकरणे प्रलंबित राहात असल्याच्या कारणावरून परिरक्षण भूमापकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

दहा वर्षांपासून प्रस्ताव धूळखात

राज्यात नगरभूमापन कार्यालयाची स्वतंत्र आस्थापना निर्माण करण्यात यावी, असा प्रस्ताव सन २०११-१२ मध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांनी शासनाला पाठविला आहे. याला १२ वर्षांचा कालावधी लोटूनही कार्यवाही झालेली नाही.

स्वतंत्र नगरभूमापन कार्यालयाची आस्थापना निर्माण होणे अत्यावश्यक आहे. याशिवाय प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार नाही. कर्मचाऱ्यांवरही कारवाईची प्रकरणे वाढतील. त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे.

- श्रीराम खिरेकर, सरचिटणीस, भूमीअभिलेख कर्मचारी संघटना

टॅग्स :Courtन्यायालयVidarbhaविदर्भ