शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: November 19, 2016 01:37 IST

नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरात होणारा पाणी पुरवठा अशुद्ध स्वरूपात होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावावणी : नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरात होणारा पाणी पुरवठा अशुद्ध स्वरूपात होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पालिकेकडून चालविले जाणारे जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावा बनले आहे. या केंद्राद्वारे पाण्याचे शुद्धीकरण केलेच जात नाही तर नदीतून ओढलेले पाणी केवळ अ‍ॅलम मिसळवून टाकीत भरले जात आहे व तेच अशुद्ध पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी पोहोचत आहे. नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळच मांडला आहे, असा आरोप होत आहे. असे असले तरी नागरिकांकडून पाणीकराची वसुली व्याजासह केली जात असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती चिड व्यक्त होत आहे.शहरातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या दैैनंदिन उपयोगाएवढे पाणी पुरविणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. पुरविलेले पाणी नागरिकांच्या आरोग्याला अपायकारकनसावे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिका नागरिकांकडून पाणी कराच्या स्वरूपात कर घेते. दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने पाणी कर वाढवून दुप्पट एक हजार ५०० रूपये केला आहे. हा कर वार्षिक न भरता त्याला तिमाहीत रूपांतर करून भरण्याची सक्ती केली. दर तिमाहीच्या कराच्या मागणी सूचना नागरिकापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे नागरिक तिमाही कर भरू शकत नाही. मग नगरपालिका तिमाही पाणीकर न भरणाऱ्या नागरिकांवर व्याजाचा भुर्दंड लावतात. मात्र महिन्यातून काही दिवस पाणी पुरवठा न झाल्यास त्याचा कर कमी केला जात नाही. पालिकेजवळ २५ वर्षांपूर्वीची लोकसंख्या विचारात घेतलेली पाणी साठव क्षमता आहे. २५ वर्षांत पालिकेने यात वाढ केली नाही. शहरातील ८० टक्के नागरिकांकडे स्वत:ची पाणी व्यवस्था आहे. त्यामुळे नगरपालिकेचे फावले जात आहे. मात्र काही भागात नागरिकांच्या बोअरला क्षारयुक्त पाणी येत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. पालिकेने पाण्याचे शुद्धीकरण करून पाण्याचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून नळाला येणाऱ्या पाण्याला दुर्गंधीही येत असल्याचे नागरिक सांगत आहे. याबाबत जलशुद्धीकरण यंत्रणेकडे चौकशी केली असता, असे कळले की जलशुद्धीकरणासाठी लागणारे ब्लिचिंग व क्लोरीमगॅस याचा पुरवठाच पालिकेकडून जलशुद्धीकरण यंत्रणेला होत नाही. वास्तविकता वर्षभरासाठी लागणारे ब्लिचिंग व क्लोरीन गॅस याचे टेंडर काढून ते संबंधित एजन्सीला देण्यात आले आहे. मात्र या एजन्सीकडून साहित्याचा पुरवठा बंद आहे. मग या साहित्याचे देयक दर महिन्याला कसे काढले जात आहे. हा चिंतनाचा विषय आहे. पाण्याचे शुद्धीकरण करण्याला किमान चार तासाचा वेळ लागतो. शुद्धीकरण करून टाकी भरण्यास दिवसभरात एकदाच टाकी भरली जावू शकते. मात्र संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसातून तिनदा टाक्या भराव्या लागतात, असे यंत्रणेकडून समजले. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण न करताच नदीच्या ओढलेल्या पाण्यात केवळ अ‍ॅलम मिसळवून पाणी टाकत चढविले जात आहे. नगरपरिषदेच्या या उदासिन धोरणामुळे बहुतांश नागरिकांना घरीच जलशुद्धीकरण यंत्र बसवून घेतले आहे. त्यामुळे नागरिकांवर यंत्र खरेदीचा व विजेचा भुर्दंड बसत आहे. मात्र आरोग्य निरामय राहण्यासाठी नागरिकांना खर्च करून पाणी शुद्ध करावे लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)