शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

धडक सिंचन विहिरींना तातडीने वीज जोडणी

By admin | Updated: October 7, 2015 03:03 IST

वीज जोडणी नसल्याने अनेक कृषीपंपधारक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओरडही वाढली आहे.

बैठक : वीज वितरण कंपनीला निर्देशयवतमाळ : वीज जोडणी नसल्याने अनेक कृषीपंपधारक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओरडही वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना तातडीने वीज जोडणी देता यावी म्हणून शासनाने जिल्ह्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी विशेष निधीही मिळणार आहे. वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या प्रलंबित सर्व विहिरींना तातडीने जोडणीचे नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.महसूल भवन येथे कृषीपंप जोडणीचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीला वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, रोहयो उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वद्देवार आदी उपस्थित होते. वीज जोडणीच्या कामाला गती देण्यासाठी जोडणीचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यात १५ ठिकाणी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम सुरु आहे. या कामासह जी विविध कामे कंत्राटदारांकडून जिल्ह्यात सुरु आहे, अशा कंत्राटदारांना कामास गती देण्याच्या अनुषंगाने वारंवार निर्देश दिले जावे. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या बाबींचा पाठपुरावा करण्याचा सूचनाही त्यांनी केल्या. धडक सिंचन योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींनाही प्राधान्याने वीज जोडणी द्यावयाचे आहे. त्यासाठी पूर्ण विहिरींची यादी प्राप्त करून घेण्यात यावी व त्या शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेऊन तातडीने या विहिरींचा वीज जोडण्या पूर्ण कराव्या, असे यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. या आढावा बैठकीमध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास योजना तसेच पायाभूत सुविधा आराखडा योजनेंतर्गत सुरु असलेल्या वीज विकासाच्या कामांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)