शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धडक सिंचन विहिरींना तातडीने वीज जोडणी

By admin | Updated: October 7, 2015 03:03 IST

वीज जोडणी नसल्याने अनेक कृषीपंपधारक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओरडही वाढली आहे.

बैठक : वीज वितरण कंपनीला निर्देशयवतमाळ : वीज जोडणी नसल्याने अनेक कृषीपंपधारक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओरडही वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना तातडीने वीज जोडणी देता यावी म्हणून शासनाने जिल्ह्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी विशेष निधीही मिळणार आहे. वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या प्रलंबित सर्व विहिरींना तातडीने जोडणीचे नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.महसूल भवन येथे कृषीपंप जोडणीचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीला वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, रोहयो उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वद्देवार आदी उपस्थित होते. वीज जोडणीच्या कामाला गती देण्यासाठी जोडणीचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यात १५ ठिकाणी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम सुरु आहे. या कामासह जी विविध कामे कंत्राटदारांकडून जिल्ह्यात सुरु आहे, अशा कंत्राटदारांना कामास गती देण्याच्या अनुषंगाने वारंवार निर्देश दिले जावे. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या बाबींचा पाठपुरावा करण्याचा सूचनाही त्यांनी केल्या. धडक सिंचन योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींनाही प्राधान्याने वीज जोडणी द्यावयाचे आहे. त्यासाठी पूर्ण विहिरींची यादी प्राप्त करून घेण्यात यावी व त्या शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेऊन तातडीने या विहिरींचा वीज जोडण्या पूर्ण कराव्या, असे यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. या आढावा बैठकीमध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास योजना तसेच पायाभूत सुविधा आराखडा योजनेंतर्गत सुरु असलेल्या वीज विकासाच्या कामांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)