शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

शाळेत तंबाखू खाणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाई

By admin | Updated: February 26, 2016 02:15 IST

तंबाखूचे सेवन हे अनेक दुर्धर आजारांना आमंत्रण देणारे आहे. ही बाब लक्षात घेता शालेय स्तरावरील मुलांच्या मनामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम बिंबविणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : शाळेजवळील तंबाखू विक्री दुकानांचे परवाने रद्द करणारयवतमाळ : तंबाखूचे सेवन हे अनेक दुर्धर आजारांना आमंत्रण देणारे आहे. ही बाब लक्षात घेता शालेय स्तरावरील मुलांच्या मनामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम बिंबविणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेत तंबाखू सेवन करून येणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त जयंत वाणे, माहिती सहायक गजानन कोटुरवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शाळांना सूचित करण्यात यावे, त्या आशयाचे फलक शाळेत लावण्यात यावे, असे सांगून या परिसरात स्थानिक स्वराज्य संस्थांनी तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानांना परवाने दिले असले तरी तीन महिन्यांच्या आत या दुकानांचे परवाने रद्द करावेत, असेही आदेश दिले. जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या पानटपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून छापे घातल्या जात आहेत. त्यासोबतच हे पदार्थ ज्या ठिकाणाहून पुरविल्या जातात, त्यात मोठा साठा बाळगणाऱ्यांवरही कारवाई केल्यास ही साखळी तोडण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. कॅन्सर झालेल्या रूग्णांमध्ये तंबाखू हे प्रमुख कारण समोर आले आहे. अल्पावधीत तंबाखूचा परिणाम दिसत नसला, तरी कालांतराने याचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८ नुसार कारवाई करण्यात यावी. या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आवश्यक असलेली पदभरतीही तातडीने करावी. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या १० दंत चिकित्सकांच्या मदतीने मार्चपासून १६ तालुक्यांत कॅन्सर आणि दंत चिकित्सा शिबिर आयोजित करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले. कॅन्सर आणि आकस्मिक मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या क्षेत्रात जबाबदारीने कार्य करण्याची गरज आहे. यामध्ये मानसिक समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तंबाखूचे सेवन सोडण्याची मानसिक तयारीही होणे गरजेचे आहे. समाजात वातावरण तयार होण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शालेयस्तरावर निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, दिंडीच्या माध्यमातून समाजात जागृती करावी, असे त्यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी येत्या काळात मनुष्यबळ वाढवून तंबाखूविरोधी कारवाई वाढवावी, आवश्यकता भासल्यास पोलीस दलातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. केवळ दंडात्मक कारवाईवर समाधान न मानता फौजदारी कारवाईही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यांमध्ये १५ प्रकरणी ३ हजार तर ३५ प्रकरणांत ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. २५ पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)