शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अवैध प्रवासी वाहतुकीचा कहर

By admin | Updated: July 14, 2017 01:50 IST

शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला आहे. शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तरी केला जातो.

पोलिसांचे दुर्लक्ष : पुसद तालुक्यात धोकादायक प्रवास, टपावरून वाहतूकलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला आहे. शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तरी केला जातो. मात्र ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच दिसत नाही. परिणामी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध प्रवाशी वाहतुकीन कहर केला आहे. धोकादायक प्रवासामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे योग्या नियोजन दिसत नाही. त्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतुकदारांना होत आहे. प्रवाशांच्या सोयीनुसार बसची सेवा दिसत नाही. अनेक मार्गावरील बससेवा कमी उत्पन्न देतात म्हणून बंद करण्यात आली. तर अनेक मार्गावारी तासन्तास प्रतीक्षा करून ही बस येत नाही. तर काही मार्गावर लागोपाठ बसेस धावतात. असे प्रकार ग्रामीण भागात पहावयास मिळतात. या गैरसोयींनी वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बसस्थानकांना खासगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा पडलेला आहे. या वाहतुकदारांचे दलाल बसस्थानकातून प्रवासी पळविण्याचेही काम करतात. हे वाहतूकदार लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाहीत. शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करतात. या गोष्टीमुळेही बसऐवजी प्रवाशांकडून रिक्षा, टॅक्सी सेवेला प्राधान्य दिले जाते. अर्थात प्रवाशांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी खासगी प्रवासी वाहतूक ही तितकीच धोकादायकही आहे. बसचालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास त्यांच्याकडून प्रधान्य दिले जाते. या उलट खासगी प्रवासी वाहतुकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या करून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षेऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या अवैध वाहतुकीला लगाम घालावा, अशी मागणी आहे.पोलिसांचे साटेलोटेवाहतूक पोलीस आणि अवैध प्रवासी वाहतूकदारांचे संबंध मधूर आहेत. त्यामुळे आॅटोरिक्षा किंवा टॅक्सीत प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. काही वेळा तर थेट मागे लटकून किंवा वर टपावर बसवून वाहतूक केली जाते. पुसद परिसरात दिसते अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे सोंग केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.