शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अवैध प्रवासी वाहतुकीचा कहर

By admin | Updated: July 14, 2017 01:50 IST

शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला आहे. शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तरी केला जातो.

पोलिसांचे दुर्लक्ष : पुसद तालुक्यात धोकादायक प्रवास, टपावरून वाहतूकलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला आहे. शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तरी केला जातो. मात्र ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच दिसत नाही. परिणामी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध प्रवाशी वाहतुकीन कहर केला आहे. धोकादायक प्रवासामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे योग्या नियोजन दिसत नाही. त्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतुकदारांना होत आहे. प्रवाशांच्या सोयीनुसार बसची सेवा दिसत नाही. अनेक मार्गावरील बससेवा कमी उत्पन्न देतात म्हणून बंद करण्यात आली. तर अनेक मार्गावारी तासन्तास प्रतीक्षा करून ही बस येत नाही. तर काही मार्गावर लागोपाठ बसेस धावतात. असे प्रकार ग्रामीण भागात पहावयास मिळतात. या गैरसोयींनी वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बसस्थानकांना खासगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा पडलेला आहे. या वाहतुकदारांचे दलाल बसस्थानकातून प्रवासी पळविण्याचेही काम करतात. हे वाहतूकदार लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाहीत. शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करतात. या गोष्टीमुळेही बसऐवजी प्रवाशांकडून रिक्षा, टॅक्सी सेवेला प्राधान्य दिले जाते. अर्थात प्रवाशांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी खासगी प्रवासी वाहतूक ही तितकीच धोकादायकही आहे. बसचालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास त्यांच्याकडून प्रधान्य दिले जाते. या उलट खासगी प्रवासी वाहतुकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या करून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षेऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या अवैध वाहतुकीला लगाम घालावा, अशी मागणी आहे.पोलिसांचे साटेलोटेवाहतूक पोलीस आणि अवैध प्रवासी वाहतूकदारांचे संबंध मधूर आहेत. त्यामुळे आॅटोरिक्षा किंवा टॅक्सीत प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. काही वेळा तर थेट मागे लटकून किंवा वर टपावर बसवून वाहतूक केली जाते. पुसद परिसरात दिसते अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे सोंग केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.