शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

नगर परिषदेच्या गाळ्यांचे बेकायदेशीर नुतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:49 IST

नगरपरिषदेच्या गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाले आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, असा प्रस्ताव खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे. मात्र मंत्रालयस्तरावर गेली १५ महिन्यांपासून हा प्रस्ताव मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देशासनादेशाचा अवमान : चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर धूळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेच्या गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाले आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, असा प्रस्ताव खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे. मात्र मंत्रालयस्तरावर गेली १५ महिन्यांपासून हा प्रस्ताव मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहे.यवतमाळ नगरपरिषदेने १४२ गाळ्यांचे २०१६ ते २०४४ अशा २९ वर्षांच्या कालावधीसाठी नुतनीकरण केले. या प्रकारात २००४ च्या शासनादेशाचा अवमान करण्यात आला आहे. सेंटर फॉर अवेअरनेसचे संचालक प्रा.डॉ. प्रदीप रामकृष्ण राऊत यांनी हा विषय जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी जिल्हाधिकाºयांना एप्रिल २०१७ मध्ये अहवाल सादर केला. गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चौकशीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी यासंदर्भात एफआयआर दाखल करायचा काय, अशी विचारणा जिल्हा प्रशासनाकडे केली. यावर शासनाकडे चौकशी प्रस्ताव पाठविल्याचा खुलासा जिल्हाधिकाºयांनी केला. याच प्रकारात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.दरम्यान, प्रा.डॉ. प्रदीप राऊत यांनी २७ आॅगस्ट २०१८ रोजी संबंधित अधिकाºयांवर थेट गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार केली. नगरपरिषद आणि निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याकडूनही या संदर्भात कारवाई करण्यात आलेली नाही. गाळेधारकांकडून लाखो रुपये मिळाल्यानेच बेकायदेशीर नुतनीकरण केल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला आहे. जिल्हाधिकाºयांच्या चौकशी प्रस्तावानंतरही कारवाई होत नसल्याने मंत्रालयातील वरिष्ठही यात सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.१०० कोटींचा फटका बसणारगैरमार्गाने नुतनीकरण केल्याने पुढील २९ वर्षे लिलाव न होताच एकाच गाळेधारकाकडे मालकी हक्क राहणार आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीवर आजवर किमान दहा कोटी, तर पुढे १०० कोटींचा फटका बसणार आहे. शासनादेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने विशेष सभा बोलवावी, अर्थलाभाच्या हेतूनेच गाळ्यांच्या नुतनीकरणात अनियमितता झाल्याने चौकशीची मागणी करावी, असे आवाहन प्रा. राऊत यांनी केले आहे.