शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नगर परिषदेच्या गाळ्यांचे बेकायदेशीर नुतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:49 IST

नगरपरिषदेच्या गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाले आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, असा प्रस्ताव खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे. मात्र मंत्रालयस्तरावर गेली १५ महिन्यांपासून हा प्रस्ताव मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देशासनादेशाचा अवमान : चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर धूळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेच्या गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाले आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, असा प्रस्ताव खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे. मात्र मंत्रालयस्तरावर गेली १५ महिन्यांपासून हा प्रस्ताव मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहे.यवतमाळ नगरपरिषदेने १४२ गाळ्यांचे २०१६ ते २०४४ अशा २९ वर्षांच्या कालावधीसाठी नुतनीकरण केले. या प्रकारात २००४ च्या शासनादेशाचा अवमान करण्यात आला आहे. सेंटर फॉर अवेअरनेसचे संचालक प्रा.डॉ. प्रदीप रामकृष्ण राऊत यांनी हा विषय जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी जिल्हाधिकाºयांना एप्रिल २०१७ मध्ये अहवाल सादर केला. गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चौकशीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी यासंदर्भात एफआयआर दाखल करायचा काय, अशी विचारणा जिल्हा प्रशासनाकडे केली. यावर शासनाकडे चौकशी प्रस्ताव पाठविल्याचा खुलासा जिल्हाधिकाºयांनी केला. याच प्रकारात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.दरम्यान, प्रा.डॉ. प्रदीप राऊत यांनी २७ आॅगस्ट २०१८ रोजी संबंधित अधिकाºयांवर थेट गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार केली. नगरपरिषद आणि निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याकडूनही या संदर्भात कारवाई करण्यात आलेली नाही. गाळेधारकांकडून लाखो रुपये मिळाल्यानेच बेकायदेशीर नुतनीकरण केल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला आहे. जिल्हाधिकाºयांच्या चौकशी प्रस्तावानंतरही कारवाई होत नसल्याने मंत्रालयातील वरिष्ठही यात सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.१०० कोटींचा फटका बसणारगैरमार्गाने नुतनीकरण केल्याने पुढील २९ वर्षे लिलाव न होताच एकाच गाळेधारकाकडे मालकी हक्क राहणार आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीवर आजवर किमान दहा कोटी, तर पुढे १०० कोटींचा फटका बसणार आहे. शासनादेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने विशेष सभा बोलवावी, अर्थलाभाच्या हेतूनेच गाळ्यांच्या नुतनीकरणात अनियमितता झाल्याने चौकशीची मागणी करावी, असे आवाहन प्रा. राऊत यांनी केले आहे.