शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नगर परिषदेच्या गाळ्यांचे बेकायदेशीर नुतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:49 IST

नगरपरिषदेच्या गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाले आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, असा प्रस्ताव खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे. मात्र मंत्रालयस्तरावर गेली १५ महिन्यांपासून हा प्रस्ताव मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देशासनादेशाचा अवमान : चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर धूळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेच्या गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाले आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, असा प्रस्ताव खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे. मात्र मंत्रालयस्तरावर गेली १५ महिन्यांपासून हा प्रस्ताव मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहे.यवतमाळ नगरपरिषदेने १४२ गाळ्यांचे २०१६ ते २०४४ अशा २९ वर्षांच्या कालावधीसाठी नुतनीकरण केले. या प्रकारात २००४ च्या शासनादेशाचा अवमान करण्यात आला आहे. सेंटर फॉर अवेअरनेसचे संचालक प्रा.डॉ. प्रदीप रामकृष्ण राऊत यांनी हा विषय जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी जिल्हाधिकाºयांना एप्रिल २०१७ मध्ये अहवाल सादर केला. गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चौकशीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी यासंदर्भात एफआयआर दाखल करायचा काय, अशी विचारणा जिल्हा प्रशासनाकडे केली. यावर शासनाकडे चौकशी प्रस्ताव पाठविल्याचा खुलासा जिल्हाधिकाºयांनी केला. याच प्रकारात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.दरम्यान, प्रा.डॉ. प्रदीप राऊत यांनी २७ आॅगस्ट २०१८ रोजी संबंधित अधिकाºयांवर थेट गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार केली. नगरपरिषद आणि निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याकडूनही या संदर्भात कारवाई करण्यात आलेली नाही. गाळेधारकांकडून लाखो रुपये मिळाल्यानेच बेकायदेशीर नुतनीकरण केल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला आहे. जिल्हाधिकाºयांच्या चौकशी प्रस्तावानंतरही कारवाई होत नसल्याने मंत्रालयातील वरिष्ठही यात सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.१०० कोटींचा फटका बसणारगैरमार्गाने नुतनीकरण केल्याने पुढील २९ वर्षे लिलाव न होताच एकाच गाळेधारकाकडे मालकी हक्क राहणार आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीवर आजवर किमान दहा कोटी, तर पुढे १०० कोटींचा फटका बसणार आहे. शासनादेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने विशेष सभा बोलवावी, अर्थलाभाच्या हेतूनेच गाळ्यांच्या नुतनीकरणात अनियमितता झाल्याने चौकशीची मागणी करावी, असे आवाहन प्रा. राऊत यांनी केले आहे.