शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गासाठी २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:31 IST

दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींचे बजेट असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी चक्क २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचा खळबळजनक प्रकार तलाठ्याच्या स्पॉट पंचनाम्याने उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देस्पॉट पंचनामा : तलाठ्याचा अहवाल, आता प्रतीक्षा कारवाईची

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींचे बजेट असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी चक्क २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचा खळबळजनक प्रकार तलाठ्याच्या स्पॉट पंचनाम्याने उघडकीस आला आहे. या प्रकरणात आता तहसीलदार पाचपट दंड व फौजदारी कारवाई करतात काय याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.दिग्रस-दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी महसूल खात्याच्या साक्षीने कंत्राटदाराकडून सर्रास उल्लंघन केले जात आहे. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर दारव्हा तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिले होते. तालुक्याच्या बागबाडी येथे सदर कंत्राटदाराला जिल्हाधिकाऱ्यांनी तीन हजार ब्रास तर तहसीलदारांनी ५०० ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी दिली होती. परंतु तलाठ्याने स्थळ पंचनामा केला असता गट क्र. ९१/२ मध्ये नऊ हजार ब्रास गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे मोजणीत आढळून आले. परवानाव्यतिरिक्त पाच हजार ५०० ब्रास गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचे ११ मे २०१८ रोजी सादर अहवालात म्हटले आहे. प्रति ब्रास ४०० रुपये प्रमाणे सुमारे २२ लाख रुपयांचे गौण खनिज विनापरवाना उत्खनन करण्यात आले आहे. नियमानुसार पाचपट दंडाची तर संबंधित वाहनावर प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची आणि संबंधितांवर फौजदारी कारवाईची तरतूद आहे. तलाठ्यांच्या या अहवालावर दारव्हा तहसीलदार आता काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरते.दारव्ह्याचा महसूल विभाग सदर कंत्राटदारासाठी बघ्याची भूमिका घेत असल्याची ओरड ऐकायला मिळते आहे. त्यानंतरही राजकीय स्तरावरून काहीच ‘हाक ना बोंब’ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गाळ उपसल्याने धरणाच्या क्षेत्रात मोठे खड्डेसदर कंत्राटदाराने तालुक्यातील शिंदी धरणातसुद्धा गाळ उपसण्याच्या निमित्ताने मोठमोठ्ठे धोकादायक खड्डे केले आहेत. वास्तविक जिल्हा प्रशासनाने या धरणाच्या भिंतीपासून २०० मीटर अंतर सोडून गाळ नेण्याचे व कोणत्याही परिस्थितीत खड्डे होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना शेतकºयांना केल्या होत्या. धरणाचा गाळ उपसला जाईल व जमीनही सूपिक होईल, असा प्रामाणिक उद्देश प्रशासनाचा या मागे होता. परंतु महामार्गाच्या कंत्राटदाराने प्रशासनाच्या या आवाहनाचा आपल्या पद्धतीने सोईस्कर अर्थ लावून धरणातील गाळाची २०० मीटर क्षेत्रात आणि त्यातही मोठमोठ्ठे खड्डे पाडून उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. या खड्ड्यांमुळे भविष्यात धरणाला धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे खड्डेसुद्धा महसूल व सिंचन प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे.