शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

महामार्गासाठी २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:31 IST

दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींचे बजेट असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी चक्क २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचा खळबळजनक प्रकार तलाठ्याच्या स्पॉट पंचनाम्याने उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देस्पॉट पंचनामा : तलाठ्याचा अहवाल, आता प्रतीक्षा कारवाईची

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींचे बजेट असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी चक्क २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचा खळबळजनक प्रकार तलाठ्याच्या स्पॉट पंचनाम्याने उघडकीस आला आहे. या प्रकरणात आता तहसीलदार पाचपट दंड व फौजदारी कारवाई करतात काय याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.दिग्रस-दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी महसूल खात्याच्या साक्षीने कंत्राटदाराकडून सर्रास उल्लंघन केले जात आहे. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर दारव्हा तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिले होते. तालुक्याच्या बागबाडी येथे सदर कंत्राटदाराला जिल्हाधिकाऱ्यांनी तीन हजार ब्रास तर तहसीलदारांनी ५०० ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी दिली होती. परंतु तलाठ्याने स्थळ पंचनामा केला असता गट क्र. ९१/२ मध्ये नऊ हजार ब्रास गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे मोजणीत आढळून आले. परवानाव्यतिरिक्त पाच हजार ५०० ब्रास गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचे ११ मे २०१८ रोजी सादर अहवालात म्हटले आहे. प्रति ब्रास ४०० रुपये प्रमाणे सुमारे २२ लाख रुपयांचे गौण खनिज विनापरवाना उत्खनन करण्यात आले आहे. नियमानुसार पाचपट दंडाची तर संबंधित वाहनावर प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची आणि संबंधितांवर फौजदारी कारवाईची तरतूद आहे. तलाठ्यांच्या या अहवालावर दारव्हा तहसीलदार आता काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरते.दारव्ह्याचा महसूल विभाग सदर कंत्राटदारासाठी बघ्याची भूमिका घेत असल्याची ओरड ऐकायला मिळते आहे. त्यानंतरही राजकीय स्तरावरून काहीच ‘हाक ना बोंब’ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गाळ उपसल्याने धरणाच्या क्षेत्रात मोठे खड्डेसदर कंत्राटदाराने तालुक्यातील शिंदी धरणातसुद्धा गाळ उपसण्याच्या निमित्ताने मोठमोठ्ठे धोकादायक खड्डे केले आहेत. वास्तविक जिल्हा प्रशासनाने या धरणाच्या भिंतीपासून २०० मीटर अंतर सोडून गाळ नेण्याचे व कोणत्याही परिस्थितीत खड्डे होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना शेतकºयांना केल्या होत्या. धरणाचा गाळ उपसला जाईल व जमीनही सूपिक होईल, असा प्रामाणिक उद्देश प्रशासनाचा या मागे होता. परंतु महामार्गाच्या कंत्राटदाराने प्रशासनाच्या या आवाहनाचा आपल्या पद्धतीने सोईस्कर अर्थ लावून धरणातील गाळाची २०० मीटर क्षेत्रात आणि त्यातही मोठमोठ्ठे खड्डे पाडून उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. या खड्ड्यांमुळे भविष्यात धरणाला धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे खड्डेसुद्धा महसूल व सिंचन प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे.