शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

पुसद शहर व परिसरात अवैध धंदे बोकाळले

By admin | Updated: March 20, 2017 00:25 IST

शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे बोकाळले असून त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

पोलिसांचे दुर्लक्ष : सर्वसामान्य नागरिकांचे होत आहेत हाल पुसद : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे बोकाळले असून त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात येवून दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक, अवैध दारू, मटका, जुगार, अवैध वृक्षतोड आदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात बळावले आहे. यातून अनेकांची संसार उद्ध्वस्त होत आहे. मात्र संबंधित शासकीय यंत्रणा डोळे बंद करून आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अवैध धंदेवाल्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतले असल्यामुळे हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते. पुसद शहरासह गाव खेड्यांमध्ये अवैध व बनावट दारू काढली जात आहे. यातून अनेकांना विविध आजारांनी घेरले आहे. गावातील तरुण पिढीही व्यसनाधिन होत आहे. तळीराम रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या मुली व मुलांना शिवीगाळ करतात. त्यामुळे वादावादीचे प्रकार होतात. आठवडीबाजारासह शहरात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. निंबी, पार्डी, खंडाळा, बेलोरा, माणिकडोह, कारला, शेंबाळपिंपरी, देवठाणा, मारवाडी, रोहडा, जांबबाजार, बान्सी, चोंढी, गहुली, काटखेडा, आरेगाव, वरूड, धुंदी, बोलगव्हाण, हर्षी, गौळ, गिळोणा, काळी, हुडी, हेगडी आदी मार्गांवर अवैध वाहतूक केली जाते. तसेच गाडीचालक नियमबाह्यरीत्या प्रवासी कोंबून भरधाव वाहने दामटतात. यातून अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांचा जीवही धोक्यात आला आहे. तालुक्यातील संवेदनशील भागात मटका व पत्त्याचे डाव रंगत असल्याचे चित्र आहे. अनेकवेळा तर या अवैध व्यवसायाच्या स्पर्धेतून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. परंतु अर्थकारणामुळे पोलीससुद्धा याकडे लक्ष देत नाही. पुसद पोलिसांच्या या अकार्यक्षमतेला वरिष्ठांचेही अभय आहे, अशी शंका जनमाणसात व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी) वरिष्ठांकडून दखल घेण्याची होत आहे मागणी पुसद शहर व तालुक्यात वाढत्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती असतानाही स्थानिक यत्रणा मात्र त्याकडे जाणिवपूर्णक दुर्लक्ष करताना दिसते. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. आता याकडे वरिष्ठांनीच लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे. अवैध दारूबाबत अनेक तक्रारी असताना पोलीसांसह उत्पादन शुल्क अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. शासकीय यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेते. लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांमधील रोष वाढतच असल्याचे दिसते.