शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

शासनाची ‘मजीप्रा’शी सापत्न वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 07:00 IST

राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. ‘मजीप्रा’ला यापासून दूर ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१५ हजारांवर कर्मचाऱ्यांचा प्रश्नहक्काच्या लाभापासून वंचित

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्याची हमी घेतानाच त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ दिले जातील, असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. आता या विभागाला सापत्न वागणूक दिली जात आहे. सातव्या वेतन आयोगासोबतच इतर लाभासाठी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचे दार ठोठावावे लागत आहे. ‘मजीप्रा’चा आर्थिक भार उचलण्यास सरकार हात आखडता घेत आहे.

२३ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार शासनाने मजीप्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्त्याची हमी घेतली. यानुसार सदर बाबींची पूर्तता केली जात आहे. यामुळे कार्यरत आणि सेवानिवृत्त अशा १५ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ दिले जात नाही. राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. ‘मजीप्रा’ला यापासून दूर ठेवण्यात आले आहे.शासनाने हमी घेतली असली तरी, अनेक लाभ मिळत नसल्याने मजीप्रा कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ दिले जातील, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले. आता मात्र काढता पाय घेतला जात आहे. प्रतिज्ञापत्रानुसार ना सरकार वागत आहे, ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

सातवा वेतन आयोग लागू झाला नसल्याने ‘मजीप्रा’ कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना देण्यासाठी ३०९ कोटी ६६ लाखांची अर्थसंकल्पीय तदतूद करण्यात आली. मात्र केवळ २०० कोटी रुपये देण्यात आले. उर्वरीत रक्कम महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने मजीप्राला दिले नाही. प्रत्येक ठिकाणी मजीप्राला डावलले जात आहे असल्याची ओरड आहे. विभागाला सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.मजीप्रातून सेवानिवृत्त झालेले ३०० कर्मचारी लाभाच्या प्रतीक्षेत दिवंगत झाले. जुलै २०१४ ते फेबु्रवारी २०१७ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी त्यांना मिळाली नाही. २४ वर्षांची (दुसरी) कालबध्द पदोन्नती लागू करून थकबाकी देण्यात आली नाही. सुधारित दराने वाहतूक भत्त्यापासूनही वंचित ठेवण्यात आले. ८० वर्षे वय झालेल्या निवृत्तांना बेसिकच्या दहा टक्के वाढीचा लाभ देण्यात आला नाही. शिवाय निवृत्तांना अंशदान आणि उपदानापासूनही दूर ठेवण्यात आले आहे.मजीप्रा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन शासनाच्या वित्त व पाणीपुरवठा विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. काही ठिकाणी शासन आणि मजीप्रा यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येते. प्राधिकरणाने पाठविलेल्या फाईलमध्ये वारंवार त्रुट्या काढल्या जातात. न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कृती व्हावी, ही अपेक्षा आहे.- आर.एन. विठाळकर, सरचिटणीस,‘मजीप्रा’ निवृत्त कर्मचारी संघटना

टॅग्स :Governmentसरकार