शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ वनविभागातील आयएफएस अभर्णा, ‘ना खाऊंगी ना खाने दूंगी’ ;   भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 11:34 IST

थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा वनविभाग भ्रष्ट वन अधिकाऱ्यांची दुकानदारी बंदलॉबिंगचा प्रयत्न, यवतमाळातून साथ

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘दुकानदारी’च बंद झाल्याने या अधिकाऱ्यांनी आता सदर महिला अधिकाऱ्याला वेगळे पाडण्यासाठी आपली लॉबिंग सुरू केली असून त्याला यवतमाळातूनही भक्कम साथ मिळत असल्याचे सांगितले जाते.पांढरकवडा वन विभागाला के. अभर्णा यांच्या रुपाने थेट आयएफएस असलेल्या अधिकारी सलग लाभल्या आहेत. त्यांची यापूर्वीची सेवा आसाममधील देशातील सर्वात मोठ्या काझीरंगा अभयारण्यात झाली आहे. त्या तुलनेत पांढरकवड्यातील आव्हान त्यांच्यापुढे अगदीच छोटे आहे. के. अभर्णा यांनी ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या पध्दतीने पांढरकवडा वन विभागातही कामाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे वन अधिकाऱ्यांच्या परंपरागत भ्रष्टाचाराला ब्रेक लागला आहे. दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या शिकारी, सागवानाची अवैध वृक्षतोड या सारख्या गैरप्रकारांना चाप बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी आता आपला वेगळा गट बनवून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळवन प्रशासनाची दिशाभूल करून पोलिसांना जंगल फिरविणारा एक वनअधिकारी गेल्या चार-पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळ ठोकून आहे. पुढील दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. काँग्रेसच्या एका दिवंगत नेत्याशी असलेल्या नातेसंबंधाच्या बळावर या अधिकाऱ्याने गेल्या वर्षी पांढरकवड्यात मुदतवाढ मिळविली होती. आताही सत्ताधारी भाजपाच्या आर्णी व राळेगावातील आमदारांची मर्जी सांभाळून सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सेवेत राहण्याचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते.

नुकसानभरपाई धनादेश विलंबानेवाघाने हल्ला केल्याच्या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईचे धनादेश तातडीने देण्याचे आदेश आयएफएस अभर्णा यांनी दिले होते. मात्र वेगवेगळी कारणे पुढे करून तब्बल दीड महिना विलंबाने हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. त्याचे श्रेय आमदारांना मिळावे म्हणून धनादेश वाटपाचा हा कार्यक्रम कालपर्यंत लांबणीवर टाकला गेला. एरव्ही वाघाने हल्ला करूनही मृताच्या घरी भेटी देण्याची फारशी तसदी न घेणारे वरिष्ठसुद्धा गुरुवारी झालेल्या धनादेश वितरण कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. या कार्यक्रमाला आयएफएस अभर्णा मात्र अनुपस्थित होत्या.

बोगस व्हाऊचर, रॉयल्टीला चापके. अभर्णा यांच्या ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या कारभारामुळे पांढरकवडा वन विभागातील भ्रष्टाचार बराच कमी झाला आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतींना, बोगस व्हाऊचरद्वारे पैसे काढण्याच्या प्रकाराला, रॉयल्टी पॅटर्नला चाप लावला आहे. त्यांनी वन खात्याला शिस्त लावली. त्या स्वत:ही दिवसा आणि रात्रीसुद्धा अचानक जंगलात गस्तीसाठी निघतात. त्यामुळे वन खात्यातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची लॉबी अस्वस्थ आहे. या लॉबीने आता आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यातून ‘आयएफएस’ला वेगळे पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे वन वर्तुळात बोलले जाते. या प्रयत्नांना यवतमाळातूनसुद्धा भक्कम साथ मिळत असल्याचीही चर्चा आहे.

वाघाच्या हल्ल्याचा सूक्ष्म अभ्यासके. अभर्णा यांच्या अभ्यासपूर्ण व सूक्ष्म निरीक्षणाचा अनुभव वाघांच्या हल्ल्याच्या घटनेतून आला. पांढरकवडा विभागात वाघाने शिकार केल्याच्या आठ घटना घडल्या आहेत. त्यातील दोन घटना या के.अभर्णा उपवनसंरक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर घडल्या आहेत. या दोनही घटनांमध्ये त्यांनी मृताच्या अंगावर वाघाचे पडलेले केस, लाळ याचे नमुने घेऊन बंगलोर व हैदराबादला तपासणीसाठी पाठविले. त्या आधारे नेमक्या कोणत्या वाघाने शिकार केली, हे शोधण्यात आले. अशा पद्धतीने यापूर्वी अनेक हल्ले होऊनही कधीच सूक्ष्म तपासणीचा प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही. एवढे हल्ले होऊनही यापुर्वी वाघाला पकडण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केले गेले नव्हते.

घातपाताचा टर्न अन् पोलीस जंगलातइकडे पाठोपाठ हल्ले होत असल्याने संबंधित एका वन अधिकाऱ्यावर बदली, निलंबन यासारखी कठोर कारवाई होऊ घातली होती. म्हणूनच की काय त्यापासून वन प्रशासनाचे लक्ष विचलित करण्यासाठी एका प्रकरणात वाघाने शिकार केलेली असताना घातपात भासविण्याचा प्रयत्न वनअधिकाऱ्यांकडून झाला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील संपूर्ण जंगल छानून काढले. मात्र तो घातपात नव्हे, तर वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यातील मृत्यूच असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला.

टॅग्स :Governmentसरकारforest departmentवनविभाग