शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

विहिरीच्या नावाखाली पैसे मागितल्यास तक्रार नोंदवा

By admin | Updated: June 3, 2015 00:06 IST

शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करून देतो, असे सांगून काही व्यक्ती त्यांच्याकडून पैसे उकळीत असल्याच्या

संजय राठोड : लाभार्थ्यांनी आर्थिक व्यवहार करू नयेयवतमाळ : शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करून देतो, असे सांगून काही व्यक्ती त्यांच्याकडून पैसे उकळीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. सिंचन विहीर पात्रतेनुसारच मंजूर केली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम लाभार्थ्यांकडून घेतली जात नाही, अशा प्रकारची रक्कम कोणी मागत असल्यास त्याची तक्रार करा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते मंगळवारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यांतर्गत धडक सिंचन विहिर योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत अनुदानावर सिंचन विहीर मंजूर करण्यात येते. विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत रक्कम कोणत्याही शासकीय कार्यालयातून घेतली जात नाही, हे लाभार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. विहीर मंजूर करून देतो म्हणून कोणी पैसे मागत असल्यास सदर व्यक्ती आपणास फसवित आहे हे लक्षात घेवून तातडीने त्या व्यक्तीची तक्रार नोंदवावी.शेतकरी सदर तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात तसेच संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे नोंदवू शकतात. शेतकऱ्यांना आपली विहिर मंजूर झाली हे कळण्यासाठी विहिर मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनीही केल्या आहे. मंजूर यादीसह प्राधान्यक्रमाची यादीही लावल्या जावी, असे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. विहिरीच्या नावाखाली पैसे मागणारी व्यक्ती आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. (प्रतिनिधी)तक्रारींची दखल आवश्यकविहिरींबाबतच नव्हे तर शासनाच्या विविध योजनांबाबत लाभार्थ्यांकडून तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि सबंधित अधिकाऱ्यांकडे दररोज असंख्य तक्रारी येतात. परंतु या तक्रारींची वेळीच दखल घेतली जात नसल्याचा अनुभव लाभार्थ्यांचा आहे. याकडेही पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.