शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीच्या नावाखाली पैसे मागितल्यास तक्रार नोंदवा

By admin | Updated: June 3, 2015 00:06 IST

शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करून देतो, असे सांगून काही व्यक्ती त्यांच्याकडून पैसे उकळीत असल्याच्या

संजय राठोड : लाभार्थ्यांनी आर्थिक व्यवहार करू नयेयवतमाळ : शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करून देतो, असे सांगून काही व्यक्ती त्यांच्याकडून पैसे उकळीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. सिंचन विहीर पात्रतेनुसारच मंजूर केली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम लाभार्थ्यांकडून घेतली जात नाही, अशा प्रकारची रक्कम कोणी मागत असल्यास त्याची तक्रार करा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते मंगळवारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यांतर्गत धडक सिंचन विहिर योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत अनुदानावर सिंचन विहीर मंजूर करण्यात येते. विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत रक्कम कोणत्याही शासकीय कार्यालयातून घेतली जात नाही, हे लाभार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. विहीर मंजूर करून देतो म्हणून कोणी पैसे मागत असल्यास सदर व्यक्ती आपणास फसवित आहे हे लक्षात घेवून तातडीने त्या व्यक्तीची तक्रार नोंदवावी.शेतकरी सदर तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात तसेच संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे नोंदवू शकतात. शेतकऱ्यांना आपली विहिर मंजूर झाली हे कळण्यासाठी विहिर मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनीही केल्या आहे. मंजूर यादीसह प्राधान्यक्रमाची यादीही लावल्या जावी, असे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. विहिरीच्या नावाखाली पैसे मागणारी व्यक्ती आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. (प्रतिनिधी)तक्रारींची दखल आवश्यकविहिरींबाबतच नव्हे तर शासनाच्या विविध योजनांबाबत लाभार्थ्यांकडून तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि सबंधित अधिकाऱ्यांकडे दररोज असंख्य तक्रारी येतात. परंतु या तक्रारींची वेळीच दखल घेतली जात नसल्याचा अनुभव लाभार्थ्यांचा आहे. याकडेही पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.