शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

महिलांनी ठरविले तर कुटुंबाची स्थिती बदलेल

By admin | Updated: March 9, 2017 00:19 IST

परिस्थिती बदलवायची असेल, तर अखंड परिश्रम घ्यावे लागतील. त्याकरिता महिलांनी पुढाकार घेतल्यास कुटुंबाची स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही,

सचिंद्र प्रताप सिंह : महिला मेळावा, महिला आर्थिक विकास महामंडळाचा पुढाकार यवतमाळ : परिस्थिती बदलवायची असेल, तर अखंड परिश्रम घ्यावे लागतील. त्याकरिता महिलांनी पुढाकार घेतल्यास कुटुंबाची स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. येथील कोल्हे सभागृहात महिला मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. महिला आर्थिक विकास महामंडळ व समन्वयीत कृषी विकास प्रकल्पातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला होते. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत देशपांडे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, ऋषीकेश घ्यार, सविता देशमुख, राम साहू, शैलेंद्र जिद्देवार, शेख रसूल, राहू वसाके, सुमित गोल्हर यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांनी गृह उद्योगासोबत विविध क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. कठोर परिश्रमाने प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. दीपक सिंगला यांनी आपले कुटुंब सक्षम करण्यासाठी प्रत्येक महिलांनी हातभार लावण्याची गरज असल्याचे सांगितले. मेळाव्यात यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. पशु सखी, इंटरनेट साथी, कायदा साथी, गाव विकास समिती, सीएमआरसी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. तुरडाळ प्रकल्पाकरिता मारेगाव आणि नेर सीएमआरसीला धनादेश देण्यात आला. संचालन सुनंदा मानकर, आभार समिर देशमुख यांनी मानले. (शहर वार्ताहर)