शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

तर देशाची प्रगती कोणी रोखू शकणार नाही

By admin | Updated: April 8, 2017 00:13 IST

संस्कारांना कृतीत उतरविले की संस्कृती बनते. आपल्या सकारात्मक संस्कृतीतून देशातील प्रत्येक नागरिक एका परिवारासारखे

मुज्जफर हुसैन : शंकरराव सरनाईक वाचनालयात चैत्र महोत्सव पुसद : संस्कारांना कृतीत उतरविले की संस्कृती बनते. आपल्या सकारात्मक संस्कृतीतून देशातील प्रत्येक नागरिक एका परिवारासारखे राहिल्यास भारताची प्रगती कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुज्जफर हुसैन यांनी येथे केले. देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने चैत्र महोत्सवाअंतर्गत आयोजित रमेश जयस्वाल स्मृती ‘भारतीय संस्कृती : काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, संस्कार कृतीत येतात तेव्हा संस्कृती बनते. शासनाचे काम, उद्देश व नीती ही त्या देशाची संस्कृती ठरते. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने काश्मीरबाबत भारत हिताची मांडलेली भूमिका भारताला बळ देणारी आहे. त्यामुळे ट्रम्प संस्कृती भारत सरकारसाठी सकारात्मक झाली. उलट पाकिस्तानसाठी नकारात्मक. सध्याच्या सरकारमुळे जगात भारताची दखल घेतली जात आहे. स्वातंत्र्यानंतर केवळ इंदिरा गांधी व आताचे नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांमुळे भारताची बाह्य ताकद वाढल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान सरकारने अंतर्गत राजकारणात वेळ घालविण्यापेक्षा अर्थव्यवस्थेला सुदृढ करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे यांनी मुज्जफर हुसैन यांचा सत्कार केला. परिचय उपाध्यक्ष अनघा गडम यांनी, संचालन मनीष अनंतवार यांनी तर आभार सहसचिव अजय क्षीरसागर यांनी मानले. यावेळी माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, डॉ.उत्तम रुद्रवार, दीपक आसेगावकर, शंतनू रिठे, अश्विन जयस्वाल उपस्थित होते. वाचनालयाचे सचिव चंद्रकांत गजबी, कोषाध्यक्ष रवी देशपांडे, सदस्य आशीष देशमुख, विजय उबाळे, अ‍ॅड.विनोद पाटील, डॉ.उमेश रेवणवार, स्मिता वाळले, सुनीता तगडपल्लेवार, ग्रंथपाल नागेश गांधे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)