शहरं
Join us  
Trending Stories
1
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
5
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
6
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
7
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
8
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
9
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
10
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
11
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
12
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
13
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
14
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
15
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
16
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
17
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
18
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
19
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
20
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालक चुकले तर, फाडणार ई-चालान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:08 IST

रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा वाहतूक शाखा आजपासून स्मार्ट : जिल्ह्यात आल्या ४३ एम-स्वाईप मशीन

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे.वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शक व्हावा म्हणून यापूर्वीच काही जिल्ह्यात ‘एक राज्य एक ई-चालान’ प्रणालीद्वारे वाहतूक शाखा स्मार्ट झाल्या होत्या. मात्र यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अंमलबजावणी खोळंबली होती. आता १ मेपासून या दोन जिल्ह्यातही नव्या प्रणालीचा अवलंब होणार आहे. राज्याच्या गृह शाखेने त्यासंदर्भातील पत्र वाहतूक शाखेला पाठविले असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.या प्रणालीसाठी एमस्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. मोबाईलसारखी ही मशिन असणार आहे. त्याला ब्लूटूथने प्रिंटर अटॅच असेल. या पद्धतीमुळे चोरीचे वाहन, चालकाचा परवाना यांची माहितीही तत्काळ मिळणार आहे. दंडाची रक्कम थेट अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेकडे जमा होणार आहे. तेथून ही रक्कम जिल्हा शाखेच्या खात्यात वळती होणार आहे.वाहतुकीला शिस्त लावताना वाहनांवर विविध नियमानुसार दंड आकारला जातो. अनेकदा हा दंड अवास्तव असल्याची ओरड होते. दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की पोलिसाच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी ई-चालान पद्धती वापरली जाणार आहे.फाडलेल्या चालानवर शासकीय नियमानुसार दंडाची रक्कम राहणार आहे. ती रक्कम अपर पोलीस महासंचालकांच्या वाहतूक शाखेला तत्काळ नोंदविली जाणार आहे. त्याचे स्वतंत्र सॉफ्टवेअर आहे. प्रसंगी डेबिट कार्डवरून रक्कम वळती करता येणार आहे. ज्याने दंड भरला, त्याला अधिकृत पावती दिली जाणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होण्यास वावनाही.परवानाधारकाचा तपशिल कळेलया प्रणालीला आरटीओ आणि पोलीस खात्याशी जोडण्यात आले आहे. यामुळे एखादे वाहन पकडले, तर ते वाहन यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात वापरले गेले होते काय, चालकावर गुन्हे आहेत काय, याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.जिल्ह्याकरिता ४३ एमस्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून १ मेपासून ई-चालान फाडले जाणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.- आकाश चव्हाणई-चालान जिल्हा समन्वयक, यवतमाळ

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस