शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

वाहनचालक चुकले तर, फाडणार ई-चालान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:08 IST

रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा वाहतूक शाखा आजपासून स्मार्ट : जिल्ह्यात आल्या ४३ एम-स्वाईप मशीन

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे.वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शक व्हावा म्हणून यापूर्वीच काही जिल्ह्यात ‘एक राज्य एक ई-चालान’ प्रणालीद्वारे वाहतूक शाखा स्मार्ट झाल्या होत्या. मात्र यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अंमलबजावणी खोळंबली होती. आता १ मेपासून या दोन जिल्ह्यातही नव्या प्रणालीचा अवलंब होणार आहे. राज्याच्या गृह शाखेने त्यासंदर्भातील पत्र वाहतूक शाखेला पाठविले असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.या प्रणालीसाठी एमस्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. मोबाईलसारखी ही मशिन असणार आहे. त्याला ब्लूटूथने प्रिंटर अटॅच असेल. या पद्धतीमुळे चोरीचे वाहन, चालकाचा परवाना यांची माहितीही तत्काळ मिळणार आहे. दंडाची रक्कम थेट अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेकडे जमा होणार आहे. तेथून ही रक्कम जिल्हा शाखेच्या खात्यात वळती होणार आहे.वाहतुकीला शिस्त लावताना वाहनांवर विविध नियमानुसार दंड आकारला जातो. अनेकदा हा दंड अवास्तव असल्याची ओरड होते. दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की पोलिसाच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी ई-चालान पद्धती वापरली जाणार आहे.फाडलेल्या चालानवर शासकीय नियमानुसार दंडाची रक्कम राहणार आहे. ती रक्कम अपर पोलीस महासंचालकांच्या वाहतूक शाखेला तत्काळ नोंदविली जाणार आहे. त्याचे स्वतंत्र सॉफ्टवेअर आहे. प्रसंगी डेबिट कार्डवरून रक्कम वळती करता येणार आहे. ज्याने दंड भरला, त्याला अधिकृत पावती दिली जाणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होण्यास वावनाही.परवानाधारकाचा तपशिल कळेलया प्रणालीला आरटीओ आणि पोलीस खात्याशी जोडण्यात आले आहे. यामुळे एखादे वाहन पकडले, तर ते वाहन यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात वापरले गेले होते काय, चालकावर गुन्हे आहेत काय, याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.जिल्ह्याकरिता ४३ एमस्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून १ मेपासून ई-चालान फाडले जाणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.- आकाश चव्हाणई-चालान जिल्हा समन्वयक, यवतमाळ

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस