शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

साहित्य संमेलनातील ‘टॉक शो; माध्यमांनी बांधीलकी आणि जबाबदारी ओळखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:41 IST

स्वायत्तता उपभोगायची असेल तर माध्यमांनी आपली बांधीलकी आणि जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे रोखठोक मत नितीन केळकर यांनी शनिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘टॉक शो’ या कार्यक्रमात मांडले.

ठळक मुद्देनितीन केळकर : माध्यमांच्या स्वायत्ततेवर ‘टॉक शो’

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : स्वायत्तता उपभोगायची असेल तर माध्यमांनी आपली बांधीलकी आणि जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे रोखठोक मत नितीन केळकर यांनी शनिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘टॉक शो’ या कार्यक्रमात मांडले.संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यामुळे ‘टॉक शो’ या कार्यक्रमातील बहुतांश निमंत्रित पाहुण्यांनी बहिष्कार टाकला. ‘माध्यमांची स्वायत्तता : नेमकी कोणाची?’ असा या चर्चासत्राचा विषय होता. त्यासाठी गिरीश कुबेर, नितीन केळकर, ज्ञानेश महाराव, प्रा. जयदेव डोळे हे निमंत्रित होते. पण यापैकी केळकर वगळता सर्वांनी बहिष्कार टाकला. तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून संजय आवटे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही बहिष्कार टाकला.त्यामुळे नितीन केळकर यांच्या सोबतीला ऐनवेळी कवयित्री अपर्णा मोहिले यांना कार्यक्रमात सहभागी करण्यात आले. तर समन्वयकाची जबाबदारी ‘लोकमत’चे भंडारा जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे यांनी पार पाडली. यावेळी नितीन केळकर म्हणाले, ज्यांनी बहिष्कार टाकला ते अवघ्या चार दिवसात व्हीसा मिळवून क्वालालंपूरच्या संमेलनाला कसे जाऊ शकतात? माहिती मिळविणे हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. माध्यमांना विशेषाधिकार हवेत तरी कशाला? जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राज्यघटनेनुसार सर्वच नागरिकांना आहे, तेच माध्यमांनाही आहे. आजचे वार्ताहर, संपादक हे पूर्वी प्रमाणे नाहीत. त्यांच्या हातून माध्यमे सुटत जाऊन मालकांच्या हाती गेली आहेत. अनेक वाहिन्या राजकीय नेत्यांच्या आणि उद्योगपतींच्या हाती आहे. या वाहिन्यांमध्ये कोणाची किती गुंतवणूक याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे. निवडणुकीत पेड न्यूज देणाऱ्यांना स्वायत्तता देऊन उपयोग काय? असा सवालही त्यांनी केला.मात्र आज आलेल्या सोशल मीडियामुळे माध्यमांना स्वायत्तता देण्याची गरजच नाही, ती आहेच. सोशल मीडियामुळे प्रत्येक नागरिकच माध्यमकर्मी झाला आहे. त्यामुळे आजच्या काळात ‘गांधीजींची तीन बंदरे व्हा’ असा सल्ला देण्यात उपयोग नाही. त्यापेक्षा जे समोर आले ते वाचा, ऐका, बघा. फक्त वाचताना रिकाम्या जागाही वाचा. ऐकताना मौनाचाही अर्थ समजून घ्या. बघताना दाखवायचे काय टाळण्यात आले त्याचा शोध घ्या. तेव्हाच माध्यमांची स्वायत्तता सर्वांच्या उपयोगाची होईल. दोन्ही बाजू मांडणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे, याचेही भान असले पाहिजे.बायको हीच पहिली सेन्सॉर!सेन्सॉरमध्ये कामाचा अनुभव असलेल्या कवयित्री अपर्णा मोहिले यांना ऐनवेळी या ‘टॉक शो’मध्ये सहभागी करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी गंभीर वातावरणाला हलके करण्याचा प्रयत्न केला. स्वायत्तता केवळ माध्यमांचीच नव्हेतर प्रत्येक व्यक्तीचीही महत्त्वाची बाब आहे. पण स्वायत्ततेचा गैरवापर होणार नाही, यासाठी सेन्सॉरशिपही गरजेची आहे. त्यादृष्टीने बायको ही प्रत्येक पुरुषाची पहिली सेन्सॉर असते. संस्थेचा विचार केला, तर प्रत्येक संस्थेचे स्वत:चे नियम असतात. शिस्त असते. त्या शिस्तीत वागण्याचे बंधन घातले म्हणजे स्वायत्तता धोक्यात आली, असे म्हणणे चुकीचे आहे. माणसाने अन्यायाच्या मार्गावरून पुढे जावे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा गैरवापर होता कामा नये. पण सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध केला जातो. त्यामुळे ती जपून वापरली पाहिजे. सेन्सॉरची कात्री आणि न्हाव्याची कात्री चुकली तर रक्तपात होतो, अशा हलक्याफुलक्या शैलीत मोहिले यांनी आपले मत मांडले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन