शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

यवतमाळात आयडियाचे नेटवर्क कोलमडले

By admin | Updated: June 29, 2016 02:35 IST

हिमालयात नेटवर्क उपलब्ध असल्याचा जाहिरातींमधून दावा करणाऱ्या आयडिया मोबाईल कंपनीचे यवतमाळ शहर व परिसरातील नेटवर्क पूर्णत: कोलमडले आहे.

२० हजार ग्राहक त्रस्त : फोर-जीचा दावा, टु-जीही सर्व्हिस मिळत नाही, कॉल डिस्कनेक्टचे प्रकार वाढलेयवतमाळ : हिमालयात नेटवर्क उपलब्ध असल्याचा जाहिरातींमधून दावा करणाऱ्या आयडिया मोबाईल कंपनीचे यवतमाळ शहर व परिसरातील नेटवर्क पूर्णत: कोलमडले आहे. फोर-जी सेवेचा डंका आयडियाकडून पिटला जात असला तरी प्रत्यक्षात साधे टु-जीचेही नेटवर्क मिळत नसल्याने हजारो ग्राहक त्रस्त झाले आहे. आयडियाचे नाव ‘एटीएनटी’ असतानापासून ग्राहक या कंपनीशी जुळले आहे. यवतमाळात सुरुवातीला आयडियाचे नेटवर्क चांगले म्हणून मोबाईल ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आयडियाला पसंती दिली. परंतु आयडियाने आपल्या सेवेकडे आणि विशेषत: नेटवर्ककडे लक्ष दिले नाही. ग्राहकांची संख्या दिवसागणिक शेकडोने वाढत असताना आयडियाने आपले मोबाईल टॉवर वाढविण्याची खबरदारी घेतली नाही. पर्यायाने टॉवर कमी आणि ग्राहक जास्त असा असमतोल निर्माण झाला. त्यातूनच नेटवर्क न मिळणे, इंटरनेटला स्पीड नसणे, एसएमएस न पोहोचणे, समोरासमोर दोन ग्राहक उभे असताना त्यांचा कॉल न लागणे, आऊट आॅफ रेंज दाखविणे, दोन सेकंदात अचानक कॉल डिस्कनेक्ट होणे या सारखे प्रकार वाढले आहे. अलिकडे तर यवतमाळ शहराच्या अगदी मध्यभागीसुद्धा आयडियाचे नेटवर्क मिळेनासे झाले आहे. त्यामुळे दरदिवशी आयडियाच्या स्थानिक केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्रस्त ग्राहक या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाईलाजाने शिव्या-शाप देऊ लागला आहे. कारण आयडियाचे वरिष्ठ अधिकारी कोण, तक्रार कुणाकडे करायची, त्यांचे मोबाईल नंबर, ई-मेल आयडी याचा कुठेच थांगपत्ता नसतो. वास्तविक याबाबी या केंद्रांमध्ये दर्शनी भागावर लिहिलेल्या असणे अपेक्षित आहे. अनेकदा ग्राहक त्रासून ‘आता आदित्य बिर्लालाच फोन करावा काय’ अशा शब्दात रोष व्यक्त करतात. आयडिया कंपनीचे कोण अधिकारी, कुठे येतात, कुठे जातात याचा कधी पत्ता लागत नाही. त्यांनी स्वत:हून ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही. आयडियाकडे येणाऱ्या तक्रारी मौखिक स्वरूपात असतात. त्या लेखी नसल्याने त्यांची संख्या आयडियाच्या बड्या अधिकाऱ्यांना माहीत नसावी. आयडियाचा सकाळी सेंड केलेला मॅसेज सायंकाळी पोहोचत असल्याचीही उदारहणे आहे. सातत्याने कॉल डिस्कनेक्ट होत असल्याने एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याचे प्रकारही वाढले आहे. घरात, कार्यालयात, मोकळ्या मैदानात एवढेच नव्हे तर आयडियाच्या स्थानिक बिल सुविधा केंद्राजवळसुद्धा कॉल लागत नसल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे. ग्राहकांच्या बिल मिळत नसल्याच्याही प्रचंड तक्रारी आहे. २० हजार ग्राहक असताना अवघ्या दोन हजार ग्राहकांचे बिल तयार केले जाते. प्री-पेड ग्राहकांचे आपसुकच रिचार्ज कमी होणे, पोस्टपेड ग्राहकांना अचानक (मागणी नसताना) नवनवीन सुविधा सुरू होणे, त्याची रक्कम देयकात लागून येणे, त्यातून देयकांचा आकडा फुगणे असे प्रकार सुरू आहे. आयडिया कंपनी सध्या फोर-जी सेवेच्या जाहिरातीत व्यस्त आहे. आपले सीमकार्ड फोर-जी करुन घेण्यासाठी ग्राहकांना आवाहन केले जात आहे. नेटवर्क चांगले मिळेल, सेवा सुधारेल या आशेने ग्राहकही सीमकार्ड फोर-जी करण्यासाठी आयडियाच्या स्थानिक कार्यालयांमध्ये गर्दी करीत आहे. परंतु फोर-जी सीमकार्ड केलेल्या ग्राहकांवर आता रडण्याची वेळ आली आहे. कारण फोर-जी सेवाच येथे सुरू झालेली नाही. त्यामुळे आता धड थ्री-जीही सेवा मिळेनासे झाले आहे. कित्येक ग्राहक तर ‘फोर-जीचे सोडा किमान टु-जीची तरी चांगली सेवा द्या’ अशी विनवणी त्रस्त होऊन आयडियाच्या येथील सेंटरला करताना दिसतात. शेकडो ग्राहकांचा संपर्क आयडियाच्या या जुन्या क्रमांकावर आहे. उद्योग-व्यवसाय व अन्य कामे या क्रमांकाशी जुळलेली असल्याने आता नंबर बदलविणे नुकसानकारक ठरते. म्हणूनच हजारो ग्राहक नाईलाजाने आयडियाशी जुळलेले आहेत. आयडियाचा कुणी वरिष्ठ अधिकारी यवतमाळात तक्रारी ऐकण्यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हजर झाल्यास त्यांच्यापुढे तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)