शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मतांसाठी नव्हे मने जिंकायला आलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:10 IST

बुधवारी जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. त्यावेळी दारव्हा येथे शिवाजी स्टेडियमवर शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा पार पडला. दारव्हा तालुक्यात यात्रा पोहोचल्यानंतर नगरसेवक प्रकाश गोकुळे यांच्या नेतृत्वात बोरी ते दारव्हापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. तसेच ठिकठिकाणी उद्घाटन कार्यक्रम व स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : दारव्हा येथे शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा, नागरिकांची मोठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : ही जनआशीर्वाद यात्रा मते मागण्यासाठी काढलेली नाही. तर लोकसभेत ज्यांनी शिवसेनेला मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी विरोधात मतदान केले, त्यांची मने जिंकण्यासाठी मी आलोय, असे प्रतिपादन करतानाच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य शासनाच्या कर्जमुक्तीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला नाही, अशी कबुलीही दिली. दारव्हा येथे पार पडलेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.बुधवारी जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. त्यावेळी दारव्हा येथे शिवाजी स्टेडियमवर शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा पार पडला. दारव्हा तालुक्यात यात्रा पोहोचल्यानंतर नगरसेवक प्रकाश गोकुळे यांच्या नेतृत्वात बोरी ते दारव्हापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. तसेच ठिकठिकाणी उद्घाटन कार्यक्रम व स्वागत करण्यात आले. दारव्ह्याच्या मेळाव्या प्रसंगी शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शिवसेनेचे दिग्रस विधानसभा मतदारसंघातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद सदस्य मंचावर उपस्थित होते.नागरिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी ‘तुम्हाला कर्जमुक्ती मिळाली का?’ असा थेट सवाल केला. त्यावेळी नागरिकांमधून ‘नाही नाही’ असा सूर उमटला. त्यानंतर ठाकरे म्हणाले, ‘तुमच्यापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ पोहोचवण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. शेवटच्या शेतकºयापर्यंत कर्जमुक्ती पोहोचवू. तुम्ही आम्हाला साथ द्या.’ यावेळी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पीकविम्याचा विषय काढून १० लाख शेतकºयांना शिवसेनेने विम्याचा लाभ मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. जनआशीर्वाद यात्रा मते मागण्यासाठी नव्हेतर, लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस मतदान केल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करण्याकरिता आहे. त्याचबरोबर ज्यांनी विरोधात मतदान केले त्यांची मने जिंकण्याकरिता ही यात्रा काढल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. या भागातील लोकांचा मोठा उत्साह माझ्यासाठी नव्हेतर राज्यमंत्री संजय राठोड व शिवसैनिकांच्या कामामुळे आहे. शिवसेनेच्या शाखा लोकांच्या कल्याणाकरिता ३६५ दिवस २४ तास उघड्या असतात. त्यामुळे भरभरून प्रेम मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बचतगटांनी तयार केलेल्या दोन लाख कापडी पिशव्यांचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केले. मेळाव्याला मतदारसंघातील महिला, पुरुषांनी मोठी गर्दी केली होती.मला नवा महाराष्ट्र घडवायचायंआदित्य ठाकरे म्हणाले, या यात्रेतून मला कुणाला मुख्यमंत्री नव्हेतर नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. जो दुष्काळमुक्त, कर्जमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असेल. शिवसेनेची ही भूमिका लोकांसमोर मांडण्याकरिता मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे. यात्रेत मी किलोमीटर नाही तर लोकांचे आशीर्वाद, प्रेम मोजत आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना