शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मतांसाठी नव्हे मने जिंकायला आलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:10 IST

बुधवारी जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. त्यावेळी दारव्हा येथे शिवाजी स्टेडियमवर शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा पार पडला. दारव्हा तालुक्यात यात्रा पोहोचल्यानंतर नगरसेवक प्रकाश गोकुळे यांच्या नेतृत्वात बोरी ते दारव्हापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. तसेच ठिकठिकाणी उद्घाटन कार्यक्रम व स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : दारव्हा येथे शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा, नागरिकांची मोठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : ही जनआशीर्वाद यात्रा मते मागण्यासाठी काढलेली नाही. तर लोकसभेत ज्यांनी शिवसेनेला मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी विरोधात मतदान केले, त्यांची मने जिंकण्यासाठी मी आलोय, असे प्रतिपादन करतानाच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य शासनाच्या कर्जमुक्तीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला नाही, अशी कबुलीही दिली. दारव्हा येथे पार पडलेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.बुधवारी जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. त्यावेळी दारव्हा येथे शिवाजी स्टेडियमवर शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा पार पडला. दारव्हा तालुक्यात यात्रा पोहोचल्यानंतर नगरसेवक प्रकाश गोकुळे यांच्या नेतृत्वात बोरी ते दारव्हापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. तसेच ठिकठिकाणी उद्घाटन कार्यक्रम व स्वागत करण्यात आले. दारव्ह्याच्या मेळाव्या प्रसंगी शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शिवसेनेचे दिग्रस विधानसभा मतदारसंघातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद सदस्य मंचावर उपस्थित होते.नागरिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी ‘तुम्हाला कर्जमुक्ती मिळाली का?’ असा थेट सवाल केला. त्यावेळी नागरिकांमधून ‘नाही नाही’ असा सूर उमटला. त्यानंतर ठाकरे म्हणाले, ‘तुमच्यापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ पोहोचवण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. शेवटच्या शेतकºयापर्यंत कर्जमुक्ती पोहोचवू. तुम्ही आम्हाला साथ द्या.’ यावेळी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पीकविम्याचा विषय काढून १० लाख शेतकºयांना शिवसेनेने विम्याचा लाभ मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. जनआशीर्वाद यात्रा मते मागण्यासाठी नव्हेतर, लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस मतदान केल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करण्याकरिता आहे. त्याचबरोबर ज्यांनी विरोधात मतदान केले त्यांची मने जिंकण्याकरिता ही यात्रा काढल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. या भागातील लोकांचा मोठा उत्साह माझ्यासाठी नव्हेतर राज्यमंत्री संजय राठोड व शिवसैनिकांच्या कामामुळे आहे. शिवसेनेच्या शाखा लोकांच्या कल्याणाकरिता ३६५ दिवस २४ तास उघड्या असतात. त्यामुळे भरभरून प्रेम मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बचतगटांनी तयार केलेल्या दोन लाख कापडी पिशव्यांचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केले. मेळाव्याला मतदारसंघातील महिला, पुरुषांनी मोठी गर्दी केली होती.मला नवा महाराष्ट्र घडवायचायंआदित्य ठाकरे म्हणाले, या यात्रेतून मला कुणाला मुख्यमंत्री नव्हेतर नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. जो दुष्काळमुक्त, कर्जमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असेल. शिवसेनेची ही भूमिका लोकांसमोर मांडण्याकरिता मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे. यात्रेत मी किलोमीटर नाही तर लोकांचे आशीर्वाद, प्रेम मोजत आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना