शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

‘स्वाईन फ्लू’साठी जिल्ह्यात हायअलर्ट

By admin | Updated: February 7, 2015 01:36 IST

अमरावती या शहरात स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले असून अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. काहींचा मृत्यू झाल्याच्याही नोंदी आहेत.

सुरेंद्र राऊत यवतमाळ नागपूर, अमरावती या शहरात स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले असून अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. काहींचा मृत्यू झाल्याच्याही नोंदी आहेत. सुदैवाने यवतमाळ जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा एकही संशयीत आढळला नाही. मात्र खबरदारीची उपाय योजना म्हणून आरोग्य यंत्रणेने स्वाईन फ्ल्यूसाठी हायअर्लट जारी केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसह जिल्ह्यात १८ ठिकाणी स्क्रिनींग सेंटर तयार करण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून जनजागृतीवर भर दिला जात आहे. यवतमाळात गतवर्षी बाहेर गाववरून आलेल्या स्वाईन फ्ल्यूच्या एका संशयीत रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुठेही स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळला नाही. यंदाही जिल्ह्यात कुठेही स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळल्याची नोंद नाही. मात्र प्रशासनाने विशेष खबरदारी म्हणून यंत्रणेला सतर्क केले आहे. विषम तापमानामुळे स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अचानक वाढलेली थंडी, ढगाळी वातावरण, त्यानंतर तापमानात झालेली वाढ हा बदल ‘एच-वन’ आणि ‘एन-वन’ या स्वाईन फ्ल्यू विषाणूसाठी पोषक ठरणारा आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातही स्वाईन फ्ल्यूच्या प्रसाराबाबत दक्षता घेतली जात आहे. सर्दी-पडसा, ताप, अंगदुखी, घशात खवखव अशीच लक्षणे स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये आढळते. त्यामुळे प्रथमदर्शनी हा आजार सहज ओळखता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेणे रुग्णांमध्ये तीन प्रकारात वर्गीकरण केले आहेत. सी, बी, ए अशी वर्गवारी करून त्या पध्दतीने उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसाठी सुध्दा हा आजार नवीनच आहे. उपचाराच्या अनुषंगाने जागृती केली जात आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बाहेरगावावरून आलेल्यांची तपासणी केली जात आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी व्हिडीओ कॉन्फरसींगच्या माध्यातून सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विषाणूच्या संसर्गाने होणार आजार असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सुध्दा सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून योग्य साधने पुरविण्यात आली आहेत. लक्षणांवरून तीन प्रकारात रुग्णांचे वर्गीकरण रुग्णांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले आहेत. यात ३८ अंशा खाली ताप, खोकला, अंगदुखणे, सर्दीपडसा, घशात खवखव यांना ‘सी’ प्रकाराता मोडले जाते. अशा रुग्णांना उपचारानंतर २४ तासांनी परत तपासणीसाठी बोलविण्यात येत आहे. प्राथमिक स्वरूपाचा उपचार देऊनही २४ तासांमध्ये रुग्णाचा ताप ३८ अंशापेक्षा वाढल्यानंतर त्याला जवळच्या स्क्रिनींग सेंटरवर पाठविण्यात येणार आहे. येथे त्यांच्या घशातील सॉब घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. हा रुग्ण ‘बी’ प्रकारात मोडतो. रुग्णाच्या सॉब तपासणीत आजार निश्चित झाल्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालया अथवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले जाणार आहे. त्यांचा स्वतंत्र कक्षात उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. असे रुग्ण ‘ए’ प्रकारात मोडतात. उपचाराच्या दृष्टीकोणातून हे वर्गीकरण केले आहे. यावरून उपचाराची दिशा ठरवून संबंधित रुग्णावर योग्य ते उपचार केले जाणार आहे. मुबंई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरांना अती जोखीम परिसर म्हणून घोषित केले आहे. येथून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. याशिवाय लक्षणे आढळल्यास प्रत्येकानेच तपासणी करून घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात टॉमी फ्ल्यूच्या २० हजार गोळ््यांचा साठा आहे. आरोग्य केंद्रावर तो उपलब्ध आहे. - डॉ. के.झेड़ राठोड जिल्हा आरोग्य अधिकारीवसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संसर्गजन्य रुग्णांच्या वॉर्डात दोन खोल्या स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णासाठी आराक्षित केले आहेत. महाविद्यालयात स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. रुग्णालयात टॉमी फ्ल्यूचा साठा उपलब्ध आहे. एकंदर तयाराची आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक आयोजित केली आहे. - डॉ. किशोर इंगोले अधीक्षक वैद्यकीय महाविद्यालय .