शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

कृषी केंद्रांच्या शेकडो गोदामांचे प्रस्ताव पडून

By admin | Updated: June 5, 2015 00:13 IST

जिल्ह्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांना आपल्या गोदामांचा विस्तार करायचा आहे.

जिल्हा परिषद कृषी विभाग : वर्षोगणती मंजुरीच नाही यवतमाळ : जिल्ह्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांना आपल्या गोदामांचा विस्तार करायचा आहे. त्यासंबंधीचे प्रस्ताव त्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांकडे सादरही केले. मात्र तेथे हे प्रस्ताव कित्येक महिन्यांपासून पडून असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या कृषी केंद्र संचालकांच्या बैठकीदरम्यान उघडकीस आला.सचिंद्र प्रताप सिंग यांनी जिल्हाभरातील खते, बियाणे, कीटकनाशकांच्या ठोक व चिल्लर विक्रेत्यांची बैठक घेतली. नियमानुसारच साहित्याची विक्री आणि साठा करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले. गैरप्रकार आढळल्यास परवान्याचे निलंबन, किमान ५० हजार रुपये दंड ठोठावण्याची तंबी देण्यात आली. नियोजित गोदामातच मालाचा साठा करा, अन्य ठिकाणी आढळलेला साठा अनधिकृत म्हणून जप्त केला जाईल, असेही बजावण्यात आले. त्यावेळी जिल्हाभरातील कृषी केंद्र संचालकांचे गोदामांच्या विस्ताराचे अनेक प्रस्ताव कृषी विकास अधिकाऱ्यांकडे (एडीओ) पडून असल्याची बाब निदर्शनास आली. हे प्रस्ताव वेळीच निकाली निघत नसल्याच्या तक्रारी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात केल्या. त्यावर प्रस्ताव केव्हापासून व कोणत्या कारणावरुन प्रलंबित आहे, याची माहिती तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. प्रस्तावात त्रुट्या असतील तर संबंधितांना बोलावून त्या दूर करा आणि कोणत्याही परिस्थितीत प्रस्ताव निकाली काढा, ते स्वीकारा अथवा नाकारा मात्र निर्णय द्या, अशा सूचना दिल्या गेल्या. नियमानुसार एकाच परवान्यावर अनेक गोदामांचा विस्तार केला जाऊ शकतो गोदामांचा पत्ता बदलविला जाऊ शकतो, गोदामांची संख्या कमीही केली जाऊ शकते. मात्र या कायद्यातील तरतुदीचे कृषी अधिकाऱ्यांना ज्ञान नसावे, असा संतप्त सूरही विक्रेत्यांमधून ऐकायला मिळाला. मोठ्या कंपन्याच्या एकाच परवान्यावर ४० ते ५० गोदाम राहतात. जिल्ह्यातील खते, बियाणे व कीटकनाशकांच्या ठोक व चिल्लर विक्रेत्यांना मात्र दुसऱ्या गोदामासाठी नव्या परवान्याचा मार्ग दाखविला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)