शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पुसद तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देएकूण रुग्णसंख्या १०८ : पुसदच्या ७१ जणांना महागावमध्ये केले क्वारंटाईन, आठ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरात कोरोनाचे तांडव सुरूच असून शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तीन तर श्ािनवारी पाच अशा आठ रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची शंभरी पार झाली आहे. एकूण बाधितांची संख्या १०८ वर पोहोचली आहे.शहर व लगतच्या परिसरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी २८ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. तरीही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील ७१ जणांना महागाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी २८ जणांचे अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाले. त्यात रहेमतनगर येथील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. तर एकूण बाधितांची संख्या १०८ वर गेली आहे. रुग्णसंख्येत वाढत होत असल्याने नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी केले आहे.प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पोलिसांनी आपला दंडूका ताकदीने चालविण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने लॉकडाऊन मोडणाऱ्या नागरिकांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचा वेग वाढविण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात शहर व तालुक्यात समूह संक्रमण होऊन कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शहरी भागात लॉकडाऊन असताना ग्रामीण भागात मात्र संचारबंदीची कोणतेही चिन्ह दिसत नाही.यामुळे भविष्यात ग्रामीण भागालाही कोरोना आपल्या कवेत घेण्याची शक्यता बळावली आहे. परिणामी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.आतापर्यंत गेले सहा बळीएकूण कोरोना रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली असताना त्यातील सहा जणांचे आतापर्यंत बळी गेले आहे. शनिवारी तालुक्यातील चोंढी येथील एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र ३८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तथापि, रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यंत्रणेने केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या