शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पुसद तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देएकूण रुग्णसंख्या १०८ : पुसदच्या ७१ जणांना महागावमध्ये केले क्वारंटाईन, आठ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरात कोरोनाचे तांडव सुरूच असून शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तीन तर श्ािनवारी पाच अशा आठ रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची शंभरी पार झाली आहे. एकूण बाधितांची संख्या १०८ वर पोहोचली आहे.शहर व लगतच्या परिसरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी २८ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. तरीही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील ७१ जणांना महागाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी २८ जणांचे अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाले. त्यात रहेमतनगर येथील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. तर एकूण बाधितांची संख्या १०८ वर गेली आहे. रुग्णसंख्येत वाढत होत असल्याने नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी केले आहे.प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पोलिसांनी आपला दंडूका ताकदीने चालविण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने लॉकडाऊन मोडणाऱ्या नागरिकांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचा वेग वाढविण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात शहर व तालुक्यात समूह संक्रमण होऊन कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शहरी भागात लॉकडाऊन असताना ग्रामीण भागात मात्र संचारबंदीची कोणतेही चिन्ह दिसत नाही.यामुळे भविष्यात ग्रामीण भागालाही कोरोना आपल्या कवेत घेण्याची शक्यता बळावली आहे. परिणामी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.आतापर्यंत गेले सहा बळीएकूण कोरोना रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली असताना त्यातील सहा जणांचे आतापर्यंत बळी गेले आहे. शनिवारी तालुक्यातील चोंढी येथील एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र ३८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तथापि, रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यंत्रणेने केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या