शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा योजनेपासून शेकडो लाभार्थी वंचित

By admin | Updated: September 28, 2015 02:49 IST

गोरगरीब अन्न धान्याअभावी अर्धपोटी राहू नये म्हणून शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली.

राजाभाऊ बेदरकर  उमरखेड गोरगरीब अन्न धान्याअभावी अर्धपोटी राहू नये म्हणून शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली. मात्र उमरखेड तालुक्यातील शेकडो कुटुंब आजही या योजनेपासून वंचित असल्याचे दिसत आहे. केवळ १३ हजार ७७३ कुटुंबांचाच या योजनेत समावेश झाल्याचे दिसत आहे.अन्न सुरक्षा योजनेचा भरपूर गाजावाजा करण्यात आला. ही योजना खरोखरच गोरगरिबांसाठी राबविली जात काय याची आवश्यकता पडताळून पाहण्याची वेळ आली आहे. ज्यांना दोन वेळच्या जेवणाची मारामार आहे असे कित्येक कुटुंब या योजनेपासून दूर फेकल्या गेली आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योजना सुरू होऊन वर्ष झाले तरी अशा कित्येक गरजू कुटुंबांना अद्यापही या योजनेत सहभागी करून घेतले नाही. सुख वस्तू कुटुंबांना सदर योजनेत घिसाड घाईने आणि वशिलेबाजीने समावेश करण्यात आल्याने गरजूंच्या तोंडचा घास हिरावला गेल्याचे वास्तव समोर येत आहे. तालुकास्तरावरील या योजनेचा उद्दिष्टांकदेखील पूर्ण झाल्याची शासकीय स्तरातून घोषणा करण्यात आली. उद्दिष्टांक पूर्ण झाला आहे. आता नव्याने प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागेल या सबबी सांगून या योजनेचा मुळातच गाभा असलेल्या गरजवंतांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना पिटाळल्या जात आहे. तालुक्यात केवळ १३ हजार ७७३ कुटुंबच अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत समाविष्ट झाले आहे. आजही शेकडो कुटुंब या योजनेपासून वंचित आहे. या योजनेला देखील शिधा पत्रिका आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही ते ग्रामीण अथवा शहरी मंडळी झोपडीत आपले जीवन कंठीत आहे. त्यांच्याकडे कागदावर दाखविण्यासाठी जागा नाही. त्यामुळे शिधापत्रिका मिळत नाही. शिधापत्रिका नसल्याने या योजनेचा लाभ होत नाही. शिधापत्रिका देण्यासाठी गाव नमुना आठ अ ची अट मारक ठरत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रभाविपणे राबविताना ही मोठी अडचण आहे आणि त्यामुळेच या योजनेपासून शेकडो कुटुंब वंचित आहे.