शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

अन्न सुरक्षा योजनेपासून शेकडो लाभार्थी वंचित

By admin | Updated: September 28, 2015 02:49 IST

गोरगरीब अन्न धान्याअभावी अर्धपोटी राहू नये म्हणून शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली.

राजाभाऊ बेदरकर  उमरखेड गोरगरीब अन्न धान्याअभावी अर्धपोटी राहू नये म्हणून शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली. मात्र उमरखेड तालुक्यातील शेकडो कुटुंब आजही या योजनेपासून वंचित असल्याचे दिसत आहे. केवळ १३ हजार ७७३ कुटुंबांचाच या योजनेत समावेश झाल्याचे दिसत आहे.अन्न सुरक्षा योजनेचा भरपूर गाजावाजा करण्यात आला. ही योजना खरोखरच गोरगरिबांसाठी राबविली जात काय याची आवश्यकता पडताळून पाहण्याची वेळ आली आहे. ज्यांना दोन वेळच्या जेवणाची मारामार आहे असे कित्येक कुटुंब या योजनेपासून दूर फेकल्या गेली आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योजना सुरू होऊन वर्ष झाले तरी अशा कित्येक गरजू कुटुंबांना अद्यापही या योजनेत सहभागी करून घेतले नाही. सुख वस्तू कुटुंबांना सदर योजनेत घिसाड घाईने आणि वशिलेबाजीने समावेश करण्यात आल्याने गरजूंच्या तोंडचा घास हिरावला गेल्याचे वास्तव समोर येत आहे. तालुकास्तरावरील या योजनेचा उद्दिष्टांकदेखील पूर्ण झाल्याची शासकीय स्तरातून घोषणा करण्यात आली. उद्दिष्टांक पूर्ण झाला आहे. आता नव्याने प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागेल या सबबी सांगून या योजनेचा मुळातच गाभा असलेल्या गरजवंतांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना पिटाळल्या जात आहे. तालुक्यात केवळ १३ हजार ७७३ कुटुंबच अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत समाविष्ट झाले आहे. आजही शेकडो कुटुंब या योजनेपासून वंचित आहे. या योजनेला देखील शिधा पत्रिका आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही ते ग्रामीण अथवा शहरी मंडळी झोपडीत आपले जीवन कंठीत आहे. त्यांच्याकडे कागदावर दाखविण्यासाठी जागा नाही. त्यामुळे शिधापत्रिका मिळत नाही. शिधापत्रिका नसल्याने या योजनेचा लाभ होत नाही. शिधापत्रिका देण्यासाठी गाव नमुना आठ अ ची अट मारक ठरत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रभाविपणे राबविताना ही मोठी अडचण आहे आणि त्यामुळेच या योजनेपासून शेकडो कुटुंब वंचित आहे.