शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

अन्न सुरक्षा योजनेपासून शेकडो लाभार्थी वंचित

By admin | Updated: September 28, 2015 02:49 IST

गोरगरीब अन्न धान्याअभावी अर्धपोटी राहू नये म्हणून शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली.

राजाभाऊ बेदरकर  उमरखेड गोरगरीब अन्न धान्याअभावी अर्धपोटी राहू नये म्हणून शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली. मात्र उमरखेड तालुक्यातील शेकडो कुटुंब आजही या योजनेपासून वंचित असल्याचे दिसत आहे. केवळ १३ हजार ७७३ कुटुंबांचाच या योजनेत समावेश झाल्याचे दिसत आहे.अन्न सुरक्षा योजनेचा भरपूर गाजावाजा करण्यात आला. ही योजना खरोखरच गोरगरिबांसाठी राबविली जात काय याची आवश्यकता पडताळून पाहण्याची वेळ आली आहे. ज्यांना दोन वेळच्या जेवणाची मारामार आहे असे कित्येक कुटुंब या योजनेपासून दूर फेकल्या गेली आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योजना सुरू होऊन वर्ष झाले तरी अशा कित्येक गरजू कुटुंबांना अद्यापही या योजनेत सहभागी करून घेतले नाही. सुख वस्तू कुटुंबांना सदर योजनेत घिसाड घाईने आणि वशिलेबाजीने समावेश करण्यात आल्याने गरजूंच्या तोंडचा घास हिरावला गेल्याचे वास्तव समोर येत आहे. तालुकास्तरावरील या योजनेचा उद्दिष्टांकदेखील पूर्ण झाल्याची शासकीय स्तरातून घोषणा करण्यात आली. उद्दिष्टांक पूर्ण झाला आहे. आता नव्याने प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागेल या सबबी सांगून या योजनेचा मुळातच गाभा असलेल्या गरजवंतांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना पिटाळल्या जात आहे. तालुक्यात केवळ १३ हजार ७७३ कुटुंबच अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत समाविष्ट झाले आहे. आजही शेकडो कुटुंब या योजनेपासून वंचित आहे. या योजनेला देखील शिधा पत्रिका आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही ते ग्रामीण अथवा शहरी मंडळी झोपडीत आपले जीवन कंठीत आहे. त्यांच्याकडे कागदावर दाखविण्यासाठी जागा नाही. त्यामुळे शिधापत्रिका मिळत नाही. शिधापत्रिका नसल्याने या योजनेचा लाभ होत नाही. शिधापत्रिका देण्यासाठी गाव नमुना आठ अ ची अट मारक ठरत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रभाविपणे राबविताना ही मोठी अडचण आहे आणि त्यामुळेच या योजनेपासून शेकडो कुटुंब वंचित आहे.