शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात हागणदारीमुक्तीचा फज्जा

By admin | Updated: June 1, 2015 00:08 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात व उमरखेड शहरात शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा स्वच्छता

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष : लाभार्थ्यांना झिजवाव्या लागत आहेत पंचायत समितीच्या पायऱ्याउमरखेड : तालुक्यातील ग्रामीण भागात व उमरखेड शहरात शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने शासनाने दुसरी महत्त्वाकांक्षी योजना हागणदारीमुक्त गाव योजनेचा संकल्प हाती घेतला. परंतु याही योजनेला ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात आहे. शासनस्तरावरून हागणदारीमुक्तीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र त्यामध्ये यश येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामीण भागात विविध आजारांचे प्रमाणही वाढत आहे. घरोघरी शौचालय बांधण्यासाठी निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात हजारो रुपये अनुदान देण्यात आले. त्यामुळे योजनेला प्रतिसादही मिळाला. परंतु अनेक ठिकाणी शौचालयाचा वापर स्रानगृहासाठी आणि शौचालयासाठी पुन्हा हागणदारीतच जाण्याची पद्धत दिसून येत आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. उघड्यावर शौचास बसल्यास दंड आकारण्यात येईल, असे बजावण्यात आले. परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही.जिल्हा परिषदेमार्फत दारिद्र्यरेषेखालील जनतेला शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु हा निधी संबंधित अधिकारी-कर्मचारी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचूच देत नाही. अनेक लाभार्थी पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या पायऱ्या झिजवून थकले. परंतु हा निधी मिळाला नाही. अनेक ठिकाणी हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैशाच्या मागणी होत असल्याचा दिसून येत आहे. यातही दलाल सक्रिय झाल्याने खरे लाभार्थी शौचालयाच्या योजनेपासून वंचितच असल्याचे दिसून येते. घरोघरी शौचालय निर्माण करून प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व्हावे, यासाठी शासनाकडून सर्वंकश प्रयत्न होत असले तरी मधातल्या यंत्रणेला समज देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीहागणदारीमुक्त योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू न देण्यासाठी अनेक ठिकाणी अधिकारी-कर्मचारी व दलाल संस्कृती कारणीभूत असल्याचे दिसून येते. लाभार्थ्यांना कार्यालयाची पायरी झिजवण्यास बाध्य करणाऱ्या आणि शासनाच्या योजनेसाठी पैसे मागणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना विश्वासात घेऊन चौकशी केल्यास सत्य समोर येईल. ग्रामीण भागातच नव्हेतर शहरी भागातही हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला शासनाचेच अधिकारी-कर्मचारी सुरुंग लावत आहेत. याकडे वरिष्ठांनी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.