शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निराधारचे पैसे आणताना माणुसकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:08 IST

निराधार वृद्धांची मोठी परवड असते. आधाराची काठी नसते, पण परिस्थितीची काठी वारंवार वार करते.

ठळक मुद्देआर्णीतील प्रकार : बँकेत कोसळलेल्या वृद्धासाठी धावले युवक, बँक कर्मचाºयांकडून मानवतेचे दर्शन

हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : निराधार वृद्धांची मोठी परवड असते. आधाराची काठी नसते, पण परिस्थितीची काठी वारंवार वार करते. पण एखादवेळी अचानक अनोळखी युवकही मदतीसाठी धावून येतात. तसाच प्रसंग गुरूवारी आर्णीत घडला. निराधारचे पैसे आणायला गेलेल्या कनिराम रत्ने यांना माणुसकीचा आधार मिळाला..!उमरी पठार येथील कनिराम रत्ने यांना निराधार योजनेतून शासकीय मदत मिळते. मात्र, ही तुटपुंजी मदत बँकेतून कशी काढायची, याची पुरेशी माहिती अनेक वृद्धांकडे नसते, तशी कनिराम यांच्याकडेही नाही. त्यांची मदत वास्तविक जवळा येथील बँक शाखेतून येत असते. पण गुरुवारी ते जवळाऐवजी आर्णीच्या स्टेट बँक शाखेत पोहोचले. तेथे गेल्यावर कर्मचाºयांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. पण आता परत जाणे अशक्य झाले. कारण बाहेर पाऊस सुरू होता. आता काय करावे? शेवटी थकलेले कनिराम बँकेतच एका कोपºयात कोसळले. बराच वेळ पडून राहिल्यावर त्यांचा डोळाही लागला.दुपारी ३.३० वाजता बँक कर्मचाºयांनी या आजोबांची वास्तपूस्त केली. काही बोलावे तर आजोबांना ऐकायलाच येत नव्हते. शेवटी पासबुक पाहून ते ‘श्रावणबाळ योजने’चे लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाले. जवळाऐवजी आर्णीच्या बँकेत आल्याचेही कर्मचाºयांनी ओळखले. बँकेतील युवा कर्मचाºयांनी आजोबांना नाश्ता, पाणी दिले. गावाकडे जाण्यासाठी तिकिटचे पैसे दिले. आॅटोरिक्षा आणला आणि आजोबांना सुखरूप गावाकडे रवाना केले. नेहमी बँक ग्राहक आणि बँक कर्मचाºयांतील वादाचेच प्रसंग घडतात सर्वत्र दिसून येतात, पण गुरुवारी आर्णी येथील बँकेत ग्राहक आणि कर्मचाºयातील माणुसकीचे सुखद व दुर्मिळ चित्रही अनेकांना पाहायला मिळाले.