शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

पुसदमध्ये बंजारा बांधवांचा विराट महाआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारच्या मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे चौक, यशवंत रंगमंदिर मैदानमार्गे मोर्चा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथील श्याम राठोड या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी गोर सेनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी बंजारा समाजबांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविले. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाला झुगारुन हा विराट मोर्चा निघाला. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळी (दौ.) येथे ३ डिसेंबर रोजी दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून काही युवकांनी श्याम शेषराव राठोड याचा खून केला होता. यानंतर काळी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे १५ दिवसांपासून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तेथे ठिय्या मांडून होते.   पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारच्या मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे चौक, यशवंत रंगमंदिर मैदानमार्गे मोर्चा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे त्यांना अभिवादन करण्यात आले. नंतर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, प्रवक्ते प्रफुल्ल जाधव यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चातील गर्दी बघून उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांनी वसंतराव नाईक चौकात येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी एका महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. 

शहराला आले पोलीस छावणीचे स्वरूप- जमावबंदी आदेशानंतरही मोर्चा निघाल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तब्बल १२ डीवायएसपी, ५७ पोलीस निरीक्षक आणि दीड  हजार पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात होता. याशिवाय पुसद उपविभागातील डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, सर्व ठाणेदार व पोलीसही तैनात होते. शहराच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली होती. मोर्चात सहभागी होण्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच अनेकांनी पुसदकडे प्रयाण केले होते. मात्र, नाकाबंदीच्या दरम्यान जवळपास दीड हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. गुरुवारी रात्रीही पोलिसांनी जवळपास ३५० जणांना स्थानबद्ध केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला झुगारले- जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश दिले होते. हे आदेश झुगारून मोर्चा निघाला. बंदोबस्तासाठी जवळपास ३०० पोलीस अधिकारी बोलाविण्यात आले होते. एसआरपीएफच्या तीन कंपन्या, शेजारील जिल्ह्यातूनही पोलीस कुमक मागविण्यात आली होती. विशेष म्हणजे, थेट राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने  अतिरिक्त बंदोबस्त पुरविला होता. बीड, अमरावती, औरंगाबाद, वर्धा, हिंगोली येथूनही जादा तुकड्या मागविण्यात आल्या होत्या.

आमदारांना पाठवले आल्या पावली परत - दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी आमदार इंद्रनील नाईक मोर्चात सहभागी होऊन सभास्थळी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांना आल्या पावली परत पाठवले.

मोर्चेकऱ्यांनी निवेदनातून केलेल्या मागण्या - आरोपींना फाशीची तर सह आरोपींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, खटला चालविण्यासाठी निष्णांत सरकारी वकिलाची नेमणूक करावी, पीडित कुटुंबाला तत्काळ २५ लाखांची मदत द्यावी, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी. भटक्या जमाती समूदायाला ॲट्रोसिटी संरक्षण देण्यासाठी कायद्यात स्वतंत्र तरतूद करावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

 

टॅग्स :Morchaमोर्चाPoliceपोलिस