शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

घाटंजी बीडीओंसह कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

सध्या ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या आहे. गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी मारत आहेत. आपल्यासोबतच कर्मचारी व ग्रामसेवकांनाही त्यांनी पूर्णत: मुभा दिल्याचे चित्र दिसत आहे. कार्यालयात उपस्थित असल्यास जनतेत जनजागृती करण्याऐवजी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी पंचायत समितीचे सर्व दरवाजे बंद करून कुणाशीही संपर्क न साधता जनतेला पंचायत समितीमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. 

ठळक मुद्देकोरोनाकाळात तालुक्यातील जनता वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : कोरोना महामारीत सतत वाढती रुग्णसंख्या व गावागावांत साथरोगामुळे भीतीचे वातावरण निर्माण होऊन अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार संचार करीत आहेत. मात्र, येथील गटविकास अधिकाऱ्यांसह पंचायत समिती कर्मचाऱ्यांना तालुक्याची ॲलर्जी दिसून येत आहे.सध्या ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या आहे. गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी मारत आहेत. आपल्यासोबतच कर्मचारी व ग्रामसेवकांनाही त्यांनी पूर्णत: मुभा दिल्याचे चित्र दिसत आहे. कार्यालयात उपस्थित असल्यास जनतेत जनजागृती करण्याऐवजी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी पंचायत समितीचे सर्व दरवाजे बंद करून कुणाशीही संपर्क न साधता जनतेला पंचायत समितीमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. कोरोनामुळे गावागावांत आपत्ती असतानासुद्धा आपत्ती व्यवस्थापन समितीमधील ग्रामसेवक, तलाठी, कृषी साहाय्यक हे सर्व दिसेनासे झाले आहे. ग्रामस्थ त्यांची व्यथा मांडण्यासाठी त्यांचा शोध घेत आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडे गेल्यास पंचायत समितीचे सर्व बाजूंनी दरवाजे बंद केले जातात. मग जनतेने भेटायचे कोणाला?, हा मोठा प्रश्न उभा आहे. पंचायत समितीमध्ये प्रवेश करण्याआधी कोरोना चाचणी करा, असे फलक लावण्यात आले आहे. मात्र, तेथे कोरोना चाचणीची कोणतीही व्यवस्था केली नाही. बाहेरून चाचणी करून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यालाही प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे प्रवेशद्वार बंद ठेवण्याचे कारण काय?, असा प्रश्न आहे. काहींनी लोकप्रतिनिधींना विचारले असता तेही मूग गिळून बसले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा शिरजोरपणा वाढला आहे. लोकप्रतिनिधी आम्हालाही काम करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे सांगून जनतेची बोळवण करीत आहे. 

घरकूल, राेहयोची कामे रखडलीगटविकास अधिकारी रुजू झाल्यापासून अपवादात्मक ग्रामपंचायतींना भेटी दिल्या आहेत. त्यांना ग्रामीण जनतेच्या कोणत्याही समस्येची अथवा कोरोना महामारीवर प्रतिबंध घालण्याशी काहीच देणे-घेणे नसल्याचे यावरून दिसून येते. शिवाय गावस्तरावर रोजगार हमी याेजनेची कामे रखडली आहे. ग्रामीण जनतेला रोजगार नाही. घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते अडकून पडले आहे. बीडीओ यवतमाळ येथे वास्तव्यास राहत असून शासकीय वाहनाने ये-जा करतात. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Employeeकर्मचारीcorona virusकोरोना वायरस बातम्या