शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

भाजीपाला दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल झाला. हे नुकसान शेतकऱ्यांना कधीही भरुन निघणार नाही, असेच होते. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. आता ८०० ते हजार एकरवर भाजीपाला शिल्लक राहिला आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर कडाडले. जिल्ह्यातील भाजीपाल्यांना मिळणारे दर लक्षात घेता इतर जिल्ह्यासह इतर राज्यांनीही जिल्ह्याकडे नजर वळविली आहे.

ठळक मुद्देपरजिल्ह्यासह परराज्यातूनही आवक : शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही दरवाढीचा फटका

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. यामुळे भाजीपाला क्षेत्रात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. याचा फटका गृहिणी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.दरवर्षी पावसाळ्यात भाज्यांचे दर वधारतात. यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांनी पाच हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली. मार्चमध्ये कोरोनाचा आजार बळावला आणि तेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झाले. यामुळे भाजीपाल्याची विक्रीच शेतकऱ्यांना करता आली नाही. लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल झाला. हे नुकसान शेतकऱ्यांना कधीही भरुन निघणार नाही, असेच होते. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. आता ८०० ते हजार एकरवर भाजीपाला शिल्लक राहिला आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर कडाडले. जिल्ह्यातील भाजीपाल्यांना मिळणारे दर लक्षात घेता इतर जिल्ह्यासह इतर राज्यांनीही जिल्ह्याकडे नजर वळविली आहे. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश शिवाय नाशिक, पुणे, औरंगाबाद, बुलडाणा, संगमनेर या ठिकाणावरूनही भाजीपाल्याची आवक जिल्ह्याच्या बाजारपेठेत झाली आहे. याचा फायदा इतर राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे.हॉटेल व्यवसायाचा भेंडीवर परिणामभेंडी सर्वाधिक आवडीची भाजी म्हणून विकली जाते. हॉटेलमध्ये याचा सर्वाधिक वापर होतो. हॉटेल व्यवसाय बंद आहे. यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेली भेंडी खरेदी करणारे ग्राहक घटले आहे. परिणामी भेंडीचे दर भाजीबाजारात जैसे थे असेच आहे. जुलै महिन्यात पावसाने भेंडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतरही भेंडीच्या दरात कुठलीही सुधारणा झाली नाही. सध्या भेंडीचे दर ४० रुपये किलो आहे.या कारणामुळे भाज्यांचे भाव वाढलेभाजीपाल्याचे क्षेत्र जिल्ह्यात कमी झाले. या ठिकाणी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांची लागवड केली. आता भाजीपाल्याचे क्षेत्र खरिपाखाली आल्यामुळे मोजक्याच क्षेत्रावर भाजीपाला लागवड शिल्लक राहिली आहे. परिणामी भाज्यांचे दर वधारले.कोरोना कधीपर्यंत कायम राहील याचा नेम नाही. यामुळे भाजीपाला उत्पादकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी भाजीपाल्यांची वाडी रिकामी केली आहे. या ठिकाणी मूग आणि उडदाची लागवड केली आहे. यातून डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढणार आहे.मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. आठवडी बाजार बंद आहेत. अशा परिस्थितीत गरज पूर्ण करण्यासाठी परराज्यातून भाजीपाल्याची आवक करण्यात येत आहे. याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे.

टॅग्स :vegetableभाज्या