शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

कथित अपहरणाच्या वार्तेची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 02:40 IST

चार लहान मुलांचे अपहरण झाल्याच्या कथीत वार्तेची शहरात अद्यापही दहशत कायम आहे.

पालक भयभीत : विद्यार्थ्यांमध्ये दहशत, पोलिसांची संपूर्ण जिल्हाभर नाकेबंदीपांढरकवडा : चार लहान मुलांचे अपहरण झाल्याच्या कथीत वार्तेची शहरात अद्यापही दहशत कायम आहे. दरम्यान कोणत्याही मुलाचे शहरातून अपहरण झाले नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ठाणेदार गुलाब वाघ यांनी केले आहे़सोमवारी येथील गजानन महाराज मंदिर परिसरातून मारोती व्हॅनमध्ये चार लहान मुलांना जबरदस्तीने टाकून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या पृथ्वी आकाश वल्लभवार या १४ वर्षीय विद्यार्थ्याने शेजारच्या लोकांना सांगितले होती. त्यावरून प्रदीप राशतवार व शेजारच्या काहींनी क्षणाचाही विलंब न करता तडकाफडकी पोलीस ठाणे गाठले होते. दरम्यान ही वार्ता शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली़ त्यामुळे पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली़ विशेष म्हणजे ज्या पृथ्वी या विद्यार्थ्याने ही घटना पोलिसांना सांगितली, त्याने कोणत्या वाहनात मुलांना नेले, त्या वाहनाचा क्रमांकही पोलिसांना सांगितला़. एम़एच़३१-क्यू.५४७४ क्रमांकाच्या मारोती व्हॅनमध्ये जबरीने मुलांना बसवून नेल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने वेगाने तपासाला सुरूवात केली़ जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, टोल नाक्यावर या क्रमांकाच्या वाहनाबाबत माहिती देण्यात आली़ सोमवारी सकाळी ९ वाजतापासून संपूर्ण शहरात कथीत अपहरणाचीच चर्चा सुरू होती. सोमवारी कृषी भवनमध्ये खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची मतमोजनणी होती़ यानिमित्ताने परिसरातील तसेच खेड्यापाड्यातील लोकांनी गर्दी केली होती़ मात्र त्याही ठिकाणी कथीत अपहरणाचीच चर्चा सुरू होती़ पोलिसांनी शहरातील सर्व शाळेत जाऊन याबाबत माहिती दिली़ मात्र तरीही दिवसभर शहरवासीयांवर भितीचे सावट पसरले होते़ अनेक पालकांनी आपली मुले शाळेत आहे, की नाही याची खात्री करून घेतली़ तथापि अद्यापही आपला मुलगा घरी आला नाही, अशा प्रकारची तक्रार कुणीही पोलिसांत केली नाही़ मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीमुळे एवढी खळबळ उडाली, तो पृथ्वी पोलिसांना दिलेल्या माहितीवर ठाम आहे़ स्वत: माझ्या डोळ्याने मी हा प्रकार पाहिल्याचे तो सांगत आहे. या प्रकाराबाबत शहरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे़ दरम्यान, हा अफवा पसरविण्याचा तर प्रकार नाही ना, याबाबतही पोलीस चौकशी करीत आहे. या अपवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)