शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

उमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 22:31 IST

आजही बंजारा समाजाच्या तांड्यांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नाईक आणि कारभारी दुर्लक्षित आहे. मात्र त्यांच्या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. उमरखेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उमरखेड व महागाव तालुक्यातील ५० तांड्यांचे नाईक व कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम : वसंतराव नाईक यांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : आजही बंजारा समाजाच्या तांड्यांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नाईक आणि कारभारी दुर्लक्षित आहे. मात्र त्यांच्या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. उमरखेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उमरखेड व महागाव तालुक्यातील ५० तांड्यांचे नाईक व कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गो.सी. गावंडे महाविद्यालयात जिल्हा अखिल कुणबी समाजातर्फे हा सत्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार अनंतकुमार पाटील होते. यावेळी बंजारा समाजाचे आद्यगुरु पोहरादेवी येथील रामराव महाराज, अ‍ॅड. आशिष देशमुख, अ‍ॅड. हटकर उपस्थित होते. आजकालचे मुख्यमंत्री शासकीय पुजेच्या निमित्ताने विठ्ठलासमोर फोटोसेशन करतात. मात्र शेतकऱ्यांनाच आपले दैवत मानणाऱ्या वसंतराव नाईकांनी आपल्या ११ वर्षाच्या कारकीर्दीत विठ्ठलाच्या चरणी लिन होण्याऐवजी शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले, असे प्रतिपादन अनंतकुमार पाटील यांनी केले. वसंतराव नाईकांनी ग्रामीण भागासाठी पाहिलेले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज तांड्यांचे नाईक व कारभारी यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर म्हणाले, तांड्यावरील नाईक आणि कारभारी यांच्या कामाची दखल म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रामराव महाराज यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात पाच नाईक व कारभारी यांना वसंतराव नाईक यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित नाईक व कारभारी यांचा माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, नंदकिशोर अग्रवाल, शिवाजी सवनेकर, वनमालाताई राठोड, नितीन भुतडा, डॉ. विश्वनाथ विणकरे, अ‍ॅड. संतोष जैन, चितांगराव कदम, नारायणदास भट्टड, बाळू पाटील चंद्रे, डॉ. आनंदराव कदम, डॉ.या.मा. राऊत, संभाजी नरवाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अ‍ॅड. हटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन प्रा.बी.यु. लाभशेटवार, चंद्रकांत ठेंगे यांनी केले. तर आभार सुधीर तंवर यांनी मानले.

टॅग्स :Vasantrao Naikवसंतराव नाईक