शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बोंडअळी मदतीच्या जीआरची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:53 IST

बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिवेशनात घोषित केलेली मदत मिळणारच नाही, अशा प्रकारचा फसवा जीआर शुक्रवारी निर्गमित करण्यात आला.

ठळक मुद्देसरकारने फसविले : शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती आक्रमक

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिवेशनात घोषित केलेली मदत मिळणारच नाही, अशा प्रकारचा फसवा जीआर शुक्रवारी निर्गमित करण्यात आला. त्यामुळे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी या जीआरची होळी केली.जीआरमधील फसव्या तरतुदींचा समाचार समितीने पत्रकार परिषदेत घेतला. समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणाले, मदतीच्या जीआरमध्ये शासनाने ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी आणि ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसानग्रस्त शेतकरी असा फरक केलेला आहे. शिवाय, प्रत्येक शेतकऱ्याचा विचार न करता महसुली मंडळनिहाय मदतीचा प्रस्ताव आहे. यामुळे गरजू शेतकरी वगळले जाण्याचा गंभीर धोका आहे. त्यातही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला नाही, त्यांना केवळ ६ हजार ८०० रुपये मिळण्याची शक्यता आहे. तीही केवळ शक्यताच आहे. कारण ज्या मंडळात कापूस पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले, त्या मंडळातील शेतकऱ्यांनाच मदत मिळणार आहे. एखाद्या संपूर्ण मंडळाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान नसेल, परंतु, त्यातील काही गावातील शेतकऱ्यांचे नुकसान अधिक असेल तर त्यांच्याविषयीची जबाबदारी शासनाने झटकली आहे. मुळात बोंडअळीसंदर्भात शासनाची भूमिका नौटंकीची आहे, असा आरोप पवार यांनी केला.या जीआरमुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. शासनाची मदत देण्याची मानसिकताच नाही. जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा कमी आणेवारी निघाल्यावरही अद्याप दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही. तसे झाले असते तर कापसासोबत सोयाबीन व इतर सर्व पिकांसाठी मदत मिळू शकली असती, असे यावेळी सांगण्यात आले. जीआरची होळी करतेवेळी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, अशोक भुतडा, राजेंद्र हेंडवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी