शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

एचआयव्हीग्रस्तांची औषधीसाठी पायपीट

By admin | Updated: May 5, 2016 02:34 IST

एचआयव्ही, एड्ससह जगणाऱ्यांना औषधीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. शासकीय रुग्णालयातून औषधींचा पुरवठा होत नसल्याने ...

आरोग्य धोक्यात : साडेतीन हजार रुग्णांचा प्रश्न यवतमाळ : एचआयव्ही, एड्ससह जगणाऱ्यांना औषधीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. शासकीय रुग्णालयातून औषधींचा पुरवठा होत नसल्याने नोंदणीकृत साडेतीन हजार रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एचआयव्ही - एड्स उपचार केंद्रात (एआरटी) जिल्ह्यातील तीन हजार ५०० रुग्ण ‘लाईन वन’चा उपचार घेत आहेत. आता औषधीत सुधारणा झाल्यानंतर एकच गोळी नियमित घ्यावी लागते. या औषधीचा नॅको (नॅशनल एड्स कंटोल आॅर्गनायझेशन) कडून पुरवठा केला जातो. टीएलई (टीनोफोव्हीट लॅमी व्होडींग इफा व्हिरेंस) या गोळीत तिन्ही घटक आहेत. मात्र महिनाभरापासून या गोळीचा पुरवठा बंद असल्याने एचआयव्ही बाधीतांची परवड होत आहे. बाहेर ही औषधी अतिशय महाग आहे. महिन्याकाठी दोन हजार रुपयांचे औषध घ्यावे लागते. व्यक्तीचा सीडीफोर ( पांढऱ्या पेशी) कमी झाल्यानंतर त्याची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. हळुहळु एचआयव्हीचा व्हायरस वाढत जातो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे टीएलई गोळ््या नियमित घेणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यापासून या औषधाचा मागणी इतका पुरवठा होत नाही. त्यामुळे औषधासाठी आलेल्या रुग्णाला परत जावे लागते. (कार्यालय प्रतिनिधी)