शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

लोकवाहिनीच्या हिताला अधिकाऱ्यांकडूनच बाधा

By admin | Updated: March 8, 2016 02:41 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील अधिकाऱ्यांकडून एसटीच्या हिताला बाधा

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील अधिकाऱ्यांकडून एसटीच्या हिताला बाधा पोहोचत आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होत नाही. उलट आर्थिक नुकसानीच्या बाबींना बळ दिले जात आहे. या प्रकारात काही कर्मचाऱ्यांवर दडपण येत आहे. या बाबी महामंडळातील सेवानिवृत्त कामगार प्रभाकर राख यांनी विभाग नियंत्रकांकडे एक पत्र देऊन मांडल्या आहे. दरम्यान, त्यांनी ८ मार्चपासून विभागीय कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. यवतमाळ आगाराचे तत्कालिन व्यवस्थापक अविनाश राजगुरे यांनी केलेल्या नियमबाह्य कामांची चौकशी करण्यात आलेली नाही. आजही यवतमाळ आगारात जास्त दराचे चालक-वाहक अतिकालिक भत्त्यासाठी वापरले जातात. कमी दराचे चालक-वाहक का वापरले जात नाही, असा प्रश्न करण्यात आला आहे. एसटीच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यवतमाळ विभागात आगार व्यवस्थापकांसाठी शासकीय निवासाची सोय करण्यात आली आहे. परंतु बहुतांश ठिकाणचे व्यवस्थापक शासकीय निवासाचा वापर करत नाही. दररोज अप-डाऊन करतात. त्यांची उपस्थिती आगारात ४-५ तास असते. परिणामी आगारातील कामकाज बाधित झाले आहे. फेऱ्या वेळेवर सुटत नाही, कामगारांच्या गैरहजेरीचे व रजेचे प्रमाण वाढले आहे. वैयक्तिक कारवाईचे प्रकारही सुरू आहे. दोषारोपपत्र देऊन चौकशीचा ससेमिरा लावला जातो. प्रकरणे कित्येक वर्ष प्रलंबित ठेवून कामगारांवर दडपण वाढविले जाते. कुठल्याही प्रकरणाचा निर्णय सहा महिन्यात द्यावा, अशी तरतूद आहे. परंतु तत्कालिन आणि विद्यमान आगार व्यवस्थापकांकडून या बाबीचे पालन केले जात नाही. या प्रकाराला नियंत्रणात आणण्याची गरज आहे. त्याशिवाय महामंडळाला चांगले दिवस येणार नाही, असे मत त्यांनी या निवेदनातून व्यक्त केले आहे. (वार्ताहर)बस जळाली, पण कचरा कायम४यवतमाळ आगारात साचलेला कचरा साफ करावा, अशी विनंती पाच वेळा पत्र देवून तत्कालिन आगार प्रमुख अविनाश राजगुरे यांना केली होती. त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. अखेर दिवाळीच्या दिवशी दोन बसेस जळाल्या. आगारातील घनकचरा बाहेर पाठविण्याची व्यवस्था केली असती; तर महामंडळाचे नुकसान झाले नसते, असे प्रभाकर राख यांनी काढलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे.