शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेतमालाला जुन्या नोटांच्या बदल्यात जास्त भाव

By admin | Updated: November 18, 2016 02:30 IST

चलनातून पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

मार्केट बंद : शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी फायद्याचा सौदागजानन अक्कलवार कळंबचलनातून पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. येथील बाजार समितीचे मार्केंट मागील नऊ तारखेपासून बंद आहे. असे असले तरी खासगीमध्ये जुन्या नोटा घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त भाव दिला जात आहे. अनेक व्यापाऱ्यांजवळ चलनातून बाद झालेल्या लाखो रुपयांच्या नोटा पडलेल्या आहेत. ही रक्कम हवालाची असल्याचे सांगितले जाते. हा पैसा कुठे खर्ची घालावा याची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडे कुठलाच पैसा नसल्यामुळे त्यांना घर कसे चालवावे, ही समस्या त्यांच्यापुढे उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस फुटलेला आहे. कापूस वेचाई करणेही गरजेचे आहे. त्यामुळे मजुरांना पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. इतर व्यवहारही ठप्प पडले आहे. अशा परिस्थिीतीत शेतमाल विकण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर दुसरीकडे शेतमाल विकून नवीन चलनातील नोटा देणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे जुन्या नोटा देऊनच व्यवहार केला जात आहे. विशेष म्हणजे जुन्या नोटा घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला जास्त किंमत दिली जात आहे. त्यामुळे हा व्यवहार चुकीचा असला तरी आता शेतकऱ्यांपुढे दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, ही वास्तविकता आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा जरी फायदा होत असला तरी व्यापाऱ्यांच्याही जुन्या नोटा चलनात येत आहे. हा त्यांच्यासाठी फायदाच म्हणावा लागेल. येथील बाजार समितीचे अधिकृत मार्केंट मागील एक हप्त्यापासून बंद आहे. त्यामुळे आपला शेतमाल कुठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यातून कसा मार्ग काढावा, याचे उत्तर कोणाजवळच नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग भरडला जात आहे. शासनाने अडीच लाखांची मर्यादा आखून दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी जुन्या नोटांना पसंती देणे सुरु केले आहे. कळंब शहरातील अनेक बँकांमध्ये पर्याप्त निधीच उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना त्यांच्या खात्यात पैसे असुनही ते मिळत नाही. सर्वांधिक गोची येथील मध्यवर्ती बँकेत खाते असणाऱ्यांची झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे यातून शासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांना चुकारे कसे मिळणार?बाजार समितीचे मार्केंट सुरु केल्यास शेतकऱ्यांना चुकारे कसे द्यावे, हा पेच निर्माण झाला आहे. बाजार समिती अ‍ॅक्टनुसार शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत रक्कम देणे बंधनकारक आहे. त्यामुळे धनादेशाने रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यामध्ये अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात २४ तासाच्या आत रक्कम येणे शक्यच नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.