शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शेतमालाला जुन्या नोटांच्या बदल्यात जास्त भाव

By admin | Updated: November 18, 2016 02:30 IST

चलनातून पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

मार्केट बंद : शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी फायद्याचा सौदागजानन अक्कलवार कळंबचलनातून पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. येथील बाजार समितीचे मार्केंट मागील नऊ तारखेपासून बंद आहे. असे असले तरी खासगीमध्ये जुन्या नोटा घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त भाव दिला जात आहे. अनेक व्यापाऱ्यांजवळ चलनातून बाद झालेल्या लाखो रुपयांच्या नोटा पडलेल्या आहेत. ही रक्कम हवालाची असल्याचे सांगितले जाते. हा पैसा कुठे खर्ची घालावा याची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडे कुठलाच पैसा नसल्यामुळे त्यांना घर कसे चालवावे, ही समस्या त्यांच्यापुढे उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस फुटलेला आहे. कापूस वेचाई करणेही गरजेचे आहे. त्यामुळे मजुरांना पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. इतर व्यवहारही ठप्प पडले आहे. अशा परिस्थिीतीत शेतमाल विकण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर दुसरीकडे शेतमाल विकून नवीन चलनातील नोटा देणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे जुन्या नोटा देऊनच व्यवहार केला जात आहे. विशेष म्हणजे जुन्या नोटा घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला जास्त किंमत दिली जात आहे. त्यामुळे हा व्यवहार चुकीचा असला तरी आता शेतकऱ्यांपुढे दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, ही वास्तविकता आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा जरी फायदा होत असला तरी व्यापाऱ्यांच्याही जुन्या नोटा चलनात येत आहे. हा त्यांच्यासाठी फायदाच म्हणावा लागेल. येथील बाजार समितीचे अधिकृत मार्केंट मागील एक हप्त्यापासून बंद आहे. त्यामुळे आपला शेतमाल कुठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यातून कसा मार्ग काढावा, याचे उत्तर कोणाजवळच नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग भरडला जात आहे. शासनाने अडीच लाखांची मर्यादा आखून दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी जुन्या नोटांना पसंती देणे सुरु केले आहे. कळंब शहरातील अनेक बँकांमध्ये पर्याप्त निधीच उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना त्यांच्या खात्यात पैसे असुनही ते मिळत नाही. सर्वांधिक गोची येथील मध्यवर्ती बँकेत खाते असणाऱ्यांची झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे यातून शासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांना चुकारे कसे मिळणार?बाजार समितीचे मार्केंट सुरु केल्यास शेतकऱ्यांना चुकारे कसे द्यावे, हा पेच निर्माण झाला आहे. बाजार समिती अ‍ॅक्टनुसार शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत रक्कम देणे बंधनकारक आहे. त्यामुळे धनादेशाने रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यामध्ये अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात २४ तासाच्या आत रक्कम येणे शक्यच नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.