शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनासाठी जिल्ह्यात हायअलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:18 IST

स्वातंत्र्यदिनी नियमित बंदोबस्त ठेवला जातो. परंतु यावेळी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून विशेष दर्जा काढून घेतला गेल्याने समाजातील एका गटाच्या कट्टर पंथीयांमध्ये नाराजी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन लक्षात घेऊन हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३७० कलमाचे सावट । पोलीस कुमक वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्यदिनी नियमित बंदोबस्त ठेवला जातो. परंतु यावेळी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून विशेष दर्जा काढून घेतला गेल्याने समाजातील एका गटाच्या कट्टर पंथीयांमध्ये नाराजी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन लक्षात घेऊन हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने पोलिसांना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. जिल्ह्यात काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील क्षेत्र संवेदनशील-अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहे. या क्षेत्रांवर पोलिसांचा अधिक फोकस राहणार आहे. नियमित बंदोबस्तापेक्षा वेगळ्या पद्धतीने बंदोबस्ताची व्यूहरचना केली जाणार आहे. त्यासाठी अधिक मनुष्यबळ नेमले जाणार आहे. १५ आॅगस्टच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय खबरदारी बाळगायची, याच्या सूचना महासंचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहे.आजच्या घडीला जिल्ह्यात अनुभवी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची वाणवा आहेत. अप्पर अधीक्षक थेट आयपीएस आहेत, पुसदलाही थेट आयपीएस देण्यात आले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळला एसडीपीओ नाहीत. अनेक ठाणेदार नवीन आहेत. त्यातच आता पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदल्यांची आणखी एक यादी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून निघणार असल्याने त्यात जिल्ह्यातील कुणाचा समावेश होतो का, याकडे नजरा लागल्या आहे. तसे झाल्यास आणखी अनुभवी ठाणेदार कमी होण्याची शक्यता आहे.थेट आयपीएसची पुसदला प्रतीक्षापुसदला थेट आयपीएस अधिकाऱ्याची एसडीपीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ते २४ आॅगस्टच्या पासिंग परेडनंतर रुजू होणार आहे. त्यानंतर चारच दिवसात गणेशोत्सव आहे. त्यामुळे या नव्या आयपीएसला आपले कार्यक्षेत्र समजून घ्यायला, अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळणार नाही. याबाबत प्रशासनात चिंता पाहायला मिळते.काश्मिरींवर वॉचजिल्ह्यात कुठे काश्मिरी युवक आहेत का याची माहिती पोलिसांनी जाणून घेतली. मात्र परीक्षा झाल्याने गावाकडे गेलेले हे युवक अद्याप परतले नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वी यवतमाळात काश्मिरी युवकांना मारहाण झाली होती. त्यामुळे पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस खबरदारी घेत आहे.

टॅग्स :Policeपोलिस