शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

स्वातंत्र्यदिनासाठी जिल्ह्यात हायअलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:18 IST

स्वातंत्र्यदिनी नियमित बंदोबस्त ठेवला जातो. परंतु यावेळी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून विशेष दर्जा काढून घेतला गेल्याने समाजातील एका गटाच्या कट्टर पंथीयांमध्ये नाराजी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन लक्षात घेऊन हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३७० कलमाचे सावट । पोलीस कुमक वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्यदिनी नियमित बंदोबस्त ठेवला जातो. परंतु यावेळी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून विशेष दर्जा काढून घेतला गेल्याने समाजातील एका गटाच्या कट्टर पंथीयांमध्ये नाराजी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन लक्षात घेऊन हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने पोलिसांना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. जिल्ह्यात काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील क्षेत्र संवेदनशील-अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहे. या क्षेत्रांवर पोलिसांचा अधिक फोकस राहणार आहे. नियमित बंदोबस्तापेक्षा वेगळ्या पद्धतीने बंदोबस्ताची व्यूहरचना केली जाणार आहे. त्यासाठी अधिक मनुष्यबळ नेमले जाणार आहे. १५ आॅगस्टच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय खबरदारी बाळगायची, याच्या सूचना महासंचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहे.आजच्या घडीला जिल्ह्यात अनुभवी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची वाणवा आहेत. अप्पर अधीक्षक थेट आयपीएस आहेत, पुसदलाही थेट आयपीएस देण्यात आले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळला एसडीपीओ नाहीत. अनेक ठाणेदार नवीन आहेत. त्यातच आता पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदल्यांची आणखी एक यादी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून निघणार असल्याने त्यात जिल्ह्यातील कुणाचा समावेश होतो का, याकडे नजरा लागल्या आहे. तसे झाल्यास आणखी अनुभवी ठाणेदार कमी होण्याची शक्यता आहे.थेट आयपीएसची पुसदला प्रतीक्षापुसदला थेट आयपीएस अधिकाऱ्याची एसडीपीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ते २४ आॅगस्टच्या पासिंग परेडनंतर रुजू होणार आहे. त्यानंतर चारच दिवसात गणेशोत्सव आहे. त्यामुळे या नव्या आयपीएसला आपले कार्यक्षेत्र समजून घ्यायला, अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळणार नाही. याबाबत प्रशासनात चिंता पाहायला मिळते.काश्मिरींवर वॉचजिल्ह्यात कुठे काश्मिरी युवक आहेत का याची माहिती पोलिसांनी जाणून घेतली. मात्र परीक्षा झाल्याने गावाकडे गेलेले हे युवक अद्याप परतले नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वी यवतमाळात काश्मिरी युवकांना मारहाण झाली होती. त्यामुळे पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस खबरदारी घेत आहे.

टॅग्स :Policeपोलिस