शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण

By admin | Updated: October 10, 2016 01:50 IST

परतीच्या पावसाचा विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याला मोठा फटका बसला. खरिपाचे प्रचंड नुकसान झाले.

आदेश : ६७ हजार हेक्टर नुकसानीचा अंदाज यवतमाळ : परतीच्या पावसाचा विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याला मोठा फटका बसला. खरिपाचे प्रचंड नुकसान झाले. यासंदर्भात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यासोबतच विमा कंपनीच्या बंद असलेल्या दूरध्वनी संदर्भात कारवाई करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिली आहे. यंदा सुरुवातीला खरीप पिकांची स्थिती अतिशय उत्तम होती. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असतानाच पावसाने दडी मारली. त्यानंतर पीक काढणीला आले असताना परतीच्या पावसाने कहर केला. गत तीन आठवड्यांपासून यवतमाळ जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काढणीला आलेला सोयाबीन उद्ध्वस्त झाला. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले. तर पऱ्हाटीचेही प्रचंड नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यात २२ हजार हेक्टर सोयाबीनला कोंब फुटल्याचे म्हटले आहे. या शेतकऱ्यांंना तत्काळ मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त भागात तलाठी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर शासन या शेतकऱ्यांना मदत देईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अद्यापही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत जिल्ह्यात सर्वेक्षण करताना तलाठी आणि कृषी विभागाची दमछाक होणार आहे. एका तलाठ्याकडे अनेक गावे असल्याने संबंधित कालावधीत तलाठी शेतापर्यंत पोहोचण्यासही वेळ लागणार आहे. परंतु या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. आता गावागावात जाऊन तलाठी नुकसानीचे सर्वेक्षण करणार आहे. (शहर वार्ताहर) विमा कंपनीची कानउघाडणी ४यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा रिलायन्स कंपनीने काढला आहे. या कंपनीच्या नियमानुसार नुकसान झाल्यास ४८ तासात संबंधित कंपनीला दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कळविणे आवश्यक आहे. परंतु गत महिनाभरापासून टोल फ्री क्रमांक आणि फॅक्स बंद आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली. त्यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्याशी संपर्क साधला. कंपनीचा निष्काळजीपणा त्यांना सांगितला. त्यावरून प्रधान सचिवांनी कारवाईचे पाऊल उचलले असून लवकरच हा दूरध्वनी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.