शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण

By admin | Updated: October 10, 2016 01:50 IST

परतीच्या पावसाचा विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याला मोठा फटका बसला. खरिपाचे प्रचंड नुकसान झाले.

आदेश : ६७ हजार हेक्टर नुकसानीचा अंदाज यवतमाळ : परतीच्या पावसाचा विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याला मोठा फटका बसला. खरिपाचे प्रचंड नुकसान झाले. यासंदर्भात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यासोबतच विमा कंपनीच्या बंद असलेल्या दूरध्वनी संदर्भात कारवाई करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिली आहे. यंदा सुरुवातीला खरीप पिकांची स्थिती अतिशय उत्तम होती. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असतानाच पावसाने दडी मारली. त्यानंतर पीक काढणीला आले असताना परतीच्या पावसाने कहर केला. गत तीन आठवड्यांपासून यवतमाळ जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काढणीला आलेला सोयाबीन उद्ध्वस्त झाला. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले. तर पऱ्हाटीचेही प्रचंड नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यात २२ हजार हेक्टर सोयाबीनला कोंब फुटल्याचे म्हटले आहे. या शेतकऱ्यांंना तत्काळ मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त भागात तलाठी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर शासन या शेतकऱ्यांना मदत देईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अद्यापही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत जिल्ह्यात सर्वेक्षण करताना तलाठी आणि कृषी विभागाची दमछाक होणार आहे. एका तलाठ्याकडे अनेक गावे असल्याने संबंधित कालावधीत तलाठी शेतापर्यंत पोहोचण्यासही वेळ लागणार आहे. परंतु या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. आता गावागावात जाऊन तलाठी नुकसानीचे सर्वेक्षण करणार आहे. (शहर वार्ताहर) विमा कंपनीची कानउघाडणी ४यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा रिलायन्स कंपनीने काढला आहे. या कंपनीच्या नियमानुसार नुकसान झाल्यास ४८ तासात संबंधित कंपनीला दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कळविणे आवश्यक आहे. परंतु गत महिनाभरापासून टोल फ्री क्रमांक आणि फॅक्स बंद आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली. त्यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्याशी संपर्क साधला. कंपनीचा निष्काळजीपणा त्यांना सांगितला. त्यावरून प्रधान सचिवांनी कारवाईचे पाऊल उचलले असून लवकरच हा दूरध्वनी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.