शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे

By admin | Updated: December 20, 2014 22:47 IST

सुमारे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठा गाजावाजा करीत नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तथापि कंत्राटदाराने

नागरिकांचा सूर : राष्ट्रीय महामार्गाची झाली प्रचंड दुर्दशाप्रवीण पिन्नमवार - पांढरकवडासुमारे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठा गाजावाजा करीत नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तथापि कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने आता या महामार्गाची अत्यंत दययीय अवस्था झाली. त्यामुळे आता ‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे म्हणण्याची वेळ आली आहे. केळापूर ते पिंपळखुटी, तसेच हिंगणघाट ते करंजी, या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग प्रचंड दुरवस्थेत आहे. या महामार्गावरून लाखो प्रवाशांना अक्षरश: मरण यातना सहन करतीच पुढील प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाच्या काठावरील गावांतील ग्रामस्थांना अनेक आजार, व्याधी जडून यातना सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेक आंदोलने झाली. शासनाला संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली. मात्र प्रत्येकवेळी पुढील वर्षीपर्यंत रस्ता दुरूस्त होईल, अअशीच तारीख देऊन बोळवण करण्यात आली. हा महामार्ग तयार करणे तर सोडाच, साधा दुरूस्तसुद्धा करण्यात आला नाही. नुकतेच या नादुरूस्त रस्त्याचे काम ३१ मार्च २०१५, तर चौपदरीकरणाचे काम ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक एम.के.जैन यांनी दिली. या महामार्गाचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही ग्वाही दिली. या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात जैन यांनी व्यक्तिश: न्यायालयात उपस्थित राहून अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या २४ डिसेंबरला होणार आहे. एकूणच या महामार्गासाठी ‘तारीख पे तारीख...’चाच अनुभव नागरिकांना येत आहे. चांगले रस्ते उपलब्ध झाल्यास परिसराचा, देशाचा विकास होतो. शेतकऱ्यांना शहराला जोडून बाजारपेठेची सुविधा उपलब्ध होते. वेळेची बचत होऊन देशाच्या विकासात भर पडते. या उदात्त हेतूने सरकारने देशात रस्ते तयार करण्याकरिता मोहिमच हाती घेतली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम १० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मात्र इतकी वर्षे आणि इतका त्रास, हा महामार्ग तयार करण्यासाठी होत असेल, तर महामार्ग नको, आम्हाला सरकारने पांदण रस्तेच तयार करून द्यावेत, असा सूर आता नागरिकांमध्ये उमटत आहे.