शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे

By admin | Updated: December 20, 2014 22:47 IST

सुमारे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठा गाजावाजा करीत नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तथापि कंत्राटदाराने

नागरिकांचा सूर : राष्ट्रीय महामार्गाची झाली प्रचंड दुर्दशाप्रवीण पिन्नमवार - पांढरकवडासुमारे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठा गाजावाजा करीत नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तथापि कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने आता या महामार्गाची अत्यंत दययीय अवस्था झाली. त्यामुळे आता ‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे म्हणण्याची वेळ आली आहे. केळापूर ते पिंपळखुटी, तसेच हिंगणघाट ते करंजी, या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग प्रचंड दुरवस्थेत आहे. या महामार्गावरून लाखो प्रवाशांना अक्षरश: मरण यातना सहन करतीच पुढील प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाच्या काठावरील गावांतील ग्रामस्थांना अनेक आजार, व्याधी जडून यातना सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेक आंदोलने झाली. शासनाला संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली. मात्र प्रत्येकवेळी पुढील वर्षीपर्यंत रस्ता दुरूस्त होईल, अअशीच तारीख देऊन बोळवण करण्यात आली. हा महामार्ग तयार करणे तर सोडाच, साधा दुरूस्तसुद्धा करण्यात आला नाही. नुकतेच या नादुरूस्त रस्त्याचे काम ३१ मार्च २०१५, तर चौपदरीकरणाचे काम ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक एम.के.जैन यांनी दिली. या महामार्गाचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही ग्वाही दिली. या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात जैन यांनी व्यक्तिश: न्यायालयात उपस्थित राहून अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या २४ डिसेंबरला होणार आहे. एकूणच या महामार्गासाठी ‘तारीख पे तारीख...’चाच अनुभव नागरिकांना येत आहे. चांगले रस्ते उपलब्ध झाल्यास परिसराचा, देशाचा विकास होतो. शेतकऱ्यांना शहराला जोडून बाजारपेठेची सुविधा उपलब्ध होते. वेळेची बचत होऊन देशाच्या विकासात भर पडते. या उदात्त हेतूने सरकारने देशात रस्ते तयार करण्याकरिता मोहिमच हाती घेतली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम १० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मात्र इतकी वर्षे आणि इतका त्रास, हा महामार्ग तयार करण्यासाठी होत असेल, तर महामार्ग नको, आम्हाला सरकारने पांदण रस्तेच तयार करून द्यावेत, असा सूर आता नागरिकांमध्ये उमटत आहे.