शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

राळेगाव येथे  जोरदार अवकाळी पाऊस; वीज पडून गुराखी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:28 IST

या पावसाने ज्वारीचे कणसे काळी पडण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे .  यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात अनेक तालुक्यात ढगाळी वातावरण आहे .दुपारी राळेगाव आणि परिसरात काही ठिकाणी विजेचा कडकडाट व जोरदार पाऊस पडला. राळेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या शेतात ज्वारी, तीळ, टरबूज  या पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसाचा फटका सर्वात जास्त भुईमूंग आणि आंब्याला बसणार आहे .

या पावसाने ज्वारीचे कणसे काळी पडण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे .  यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णता हतबल झाले. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं जीव टांगणीला लागला आहे. खरीप हंगामात पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यात रब्बी  आणि उन्हाळी पिकांवर त्यांची भिस्त होती.  ती  अवकाळी पावसाने व ढगाळ  वातावरणाने हिरावली. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. बदलत्या हवामानाने हवेत गारवा पसरल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु याच हवामानाने संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती सुद्धा आहे .

राळेगाव येथे वीज पडून गुराखी ठार

तालुक्यात गुरुवारी दुपारी अवकाळी वादळी पाऊस झाला. त्यातच अंगावर वीज कोसळल्याने १५ वर्षीय गुराखी युवक मृत्यूमुखी पडला. शेवन शंकर पवार (१५) रा.वडजई असे मृत युवकाचे नाव आहे. तो राळेगाव येथील एचपी जिनिंगच्या मागील बाजूला बकऱ्या चारण्यासाठी गेला असताना दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसातच त्याच्या अंगावर वीज कोसळली. यात त्याचा मृत्यू झाला. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेतली. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊस