शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दमदार पावसाची हजेरी

By admin | Updated: June 19, 2014 00:17 IST

मृग नक्षत्रातला पहिला पाऊस मंगळवारी जिल्हयात बरसला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ३७ मिमीची नोंद केली आहे. सर्वाधिक ७३ मिमी पावसाची नोंद

३७ मिमी पाऊस : यवतमाळात सर्वाधिक पावसाची नोंदयवतमाळ : मृग नक्षत्रातला पहिला पाऊस मंगळवारी जिल्हयात बरसला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ३७ मिमीची नोंद केली आहे. सर्वाधिक ७३ मिमी पावसाची नोंद यवतमाळात करण्यात आली. जिल्ह्यात कमी अधिक स्वरूपात सर्वत्र पाऊस बरसला. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. गत वर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभा पासूनच पावसाने हजेरी लावली होती. यावर्षी तब्बल ११ दिवस उशिराने पाऊस आला. त्यामुळे पेरणी खोळंबल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळाले. गतवर्षी १८ जुन पर्यंत ४० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात उशिरा धडकलेल्या मानसुनने पेरण्या खोळंबल्या आहे. पेरण्या लांबल्याने मुग आणि उडीदाचे क्षेत्र घटन्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.न मिळणारे सोयाबीनचे बियाणे आणि अशिरा लांबलेल्या पेरण्या यामुळे कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नियोजनात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.गत २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंंद यवतमाळात करण्यात आली. या ठिकाणी ७३.०४ मिमी पाऊस बरसला. कळंब तालुक्यात ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. बाभुळगाव तालुक्यात ५३ मिमी पाऊस बरसला. आर्णी २९मिमी, दारव्हा ४२ मिमी, दिग्रस १७ मिमी, नेर ७० मिमी, पुसद १ मिमी, महागाव १३ मिमी, केळापूर १३ मिमी, घाटंजी २८ मिमी, राळेगाव ६२ मिमी, वणी ४६ मिमी, मारेगाव ५६ मिमी तर झरी तालुक्यात ३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असून अनेकांनी पेरणीची तयारी चालविली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने शेतकऱ्यांसोबत लपंडाव केला आहे. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचा हंगाम गेला. त्यानंतर रबी हंगामापासून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. रबीतील पिकेसुद्धा चांगीच बहरली होती. परंतु पिके काढणीला आल्यावर जिल्ह्यात अचानक मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. या सर्व संकटातून सावरत शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने खरिपाच्या लागवडीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. (शहर वार्ताहर)