शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

दमदार पावसाची हजेरी

By admin | Updated: June 19, 2014 00:17 IST

मृग नक्षत्रातला पहिला पाऊस मंगळवारी जिल्हयात बरसला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ३७ मिमीची नोंद केली आहे. सर्वाधिक ७३ मिमी पावसाची नोंद

३७ मिमी पाऊस : यवतमाळात सर्वाधिक पावसाची नोंदयवतमाळ : मृग नक्षत्रातला पहिला पाऊस मंगळवारी जिल्हयात बरसला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ३७ मिमीची नोंद केली आहे. सर्वाधिक ७३ मिमी पावसाची नोंद यवतमाळात करण्यात आली. जिल्ह्यात कमी अधिक स्वरूपात सर्वत्र पाऊस बरसला. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. गत वर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभा पासूनच पावसाने हजेरी लावली होती. यावर्षी तब्बल ११ दिवस उशिराने पाऊस आला. त्यामुळे पेरणी खोळंबल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळाले. गतवर्षी १८ जुन पर्यंत ४० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात उशिरा धडकलेल्या मानसुनने पेरण्या खोळंबल्या आहे. पेरण्या लांबल्याने मुग आणि उडीदाचे क्षेत्र घटन्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.न मिळणारे सोयाबीनचे बियाणे आणि अशिरा लांबलेल्या पेरण्या यामुळे कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नियोजनात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.गत २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंंद यवतमाळात करण्यात आली. या ठिकाणी ७३.०४ मिमी पाऊस बरसला. कळंब तालुक्यात ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. बाभुळगाव तालुक्यात ५३ मिमी पाऊस बरसला. आर्णी २९मिमी, दारव्हा ४२ मिमी, दिग्रस १७ मिमी, नेर ७० मिमी, पुसद १ मिमी, महागाव १३ मिमी, केळापूर १३ मिमी, घाटंजी २८ मिमी, राळेगाव ६२ मिमी, वणी ४६ मिमी, मारेगाव ५६ मिमी तर झरी तालुक्यात ३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असून अनेकांनी पेरणीची तयारी चालविली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने शेतकऱ्यांसोबत लपंडाव केला आहे. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचा हंगाम गेला. त्यानंतर रबी हंगामापासून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. रबीतील पिकेसुद्धा चांगीच बहरली होती. परंतु पिके काढणीला आल्यावर जिल्ह्यात अचानक मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. या सर्व संकटातून सावरत शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने खरिपाच्या लागवडीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. (शहर वार्ताहर)