शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पहिल्यांदाच दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:20 IST

यावर्षी जिल्ह्यात धुवाधार पावसाने हजेरीच लावली नाही. यामुळे नदी, नाल्यांना पूर गेला नाही. जिल्ह्यातील पावसाची सरासरी २० ते २५ मिमीच्याच आसपास राहिली आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. यामुळे सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसरासरी ३६ मिमी पावसाची नोंद : पिकांना जीवदान, धरणांना अजूनही प्रतीक्षा, वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात धुवाधार पावसाने हजेरीच लावली नाही. यामुळे नदी, नाल्यांना पूर गेला नाही. जिल्ह्यातील पावसाची सरासरी २० ते २५ मिमीच्याच आसपास राहिली आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. यामुळे सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने काही नदी, नाल्यांना पूर आला. काही ठिकाणी वाहतूक थांबली आहे. मात्र धरणातील जलसाठा वाढण्यासाठी यापेक्षाही मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात ३० जुलैपर्यंत साधारणत: ४४८ मिमी पाऊस बरसतो. यापर्षी प्रत्यक्षात १८४ मिमी पाऊस बरसला. सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ५२ टक्याने कमी आहे. पावसाअभावी पिकांची स्थिती नाजूक झाली होती. सोमवार-मंगळवारचा पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरला आहे. मात्र काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात गत २४ तासापासून ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासात आणखी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलप्रकल्पामध्ये २५ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. हा पाऊस आणखी असाच बरसला तर प्रकल्प भरण्यास वेळ लागणार नाही.तालुकानिहाय पाऊसयवतमाळ १६ मिमी, बाभूळगाव १२ मिमी, कळंब २० मिमी, आर्णी ५९ मिमी, दारव्हा १६ मिमी, दिग्रस २७ मिमी, नेर १० मिमी, पुसद १७ मिमी, दिग्रस २७ मिमी, नेर १० मिमी, पुसद १७ मिमी, उमरखेड २७ मिमी, महागाव २२ मिमी, केळापूर ८० मिमी, घाटंजी ५२ मिमी, राळेगाव ४१ मिमी, वणी ५० मिमी, मारेगाव ५९ मिमी, झरीमध्ये ५६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.मान्सूनपूर्व उपाययोजनांचा बोजवारानगरपरिषदेने मान्सूनपूर्व कामांकडे प्रचंड दुर्लक्ष केले. त्याचे दुष्परिणाम मंगळवारच्या पावसादरम्यान नागरिकांना भोगावे लागले. नगरपरिषदेने सफाई न केल्याने शहरात मंगळवारी जागोजागी पावसाचे पाणी साचले. हे पाणी अडून वस्त्यांमध्ये शिरले. पाण्याचा निचरा करण्यासाठी आता ऐनवेळी नगरपरिषदेने चार सदस्यांचे पथक तयार केले. एक जेसीबी त्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला होता. या पथकाने मंगळवारी दिवसभर विविध भागात सफाई मोहीम राबविली. मात्र हेच काम पावसापूर्वी का केले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर