शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

जिल्ह्यात पहिल्यांदाच दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:20 IST

यावर्षी जिल्ह्यात धुवाधार पावसाने हजेरीच लावली नाही. यामुळे नदी, नाल्यांना पूर गेला नाही. जिल्ह्यातील पावसाची सरासरी २० ते २५ मिमीच्याच आसपास राहिली आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. यामुळे सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसरासरी ३६ मिमी पावसाची नोंद : पिकांना जीवदान, धरणांना अजूनही प्रतीक्षा, वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात धुवाधार पावसाने हजेरीच लावली नाही. यामुळे नदी, नाल्यांना पूर गेला नाही. जिल्ह्यातील पावसाची सरासरी २० ते २५ मिमीच्याच आसपास राहिली आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. यामुळे सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने काही नदी, नाल्यांना पूर आला. काही ठिकाणी वाहतूक थांबली आहे. मात्र धरणातील जलसाठा वाढण्यासाठी यापेक्षाही मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात ३० जुलैपर्यंत साधारणत: ४४८ मिमी पाऊस बरसतो. यापर्षी प्रत्यक्षात १८४ मिमी पाऊस बरसला. सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ५२ टक्याने कमी आहे. पावसाअभावी पिकांची स्थिती नाजूक झाली होती. सोमवार-मंगळवारचा पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरला आहे. मात्र काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात गत २४ तासापासून ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासात आणखी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलप्रकल्पामध्ये २५ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. हा पाऊस आणखी असाच बरसला तर प्रकल्प भरण्यास वेळ लागणार नाही.तालुकानिहाय पाऊसयवतमाळ १६ मिमी, बाभूळगाव १२ मिमी, कळंब २० मिमी, आर्णी ५९ मिमी, दारव्हा १६ मिमी, दिग्रस २७ मिमी, नेर १० मिमी, पुसद १७ मिमी, दिग्रस २७ मिमी, नेर १० मिमी, पुसद १७ मिमी, उमरखेड २७ मिमी, महागाव २२ मिमी, केळापूर ८० मिमी, घाटंजी ५२ मिमी, राळेगाव ४१ मिमी, वणी ५० मिमी, मारेगाव ५९ मिमी, झरीमध्ये ५६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.मान्सूनपूर्व उपाययोजनांचा बोजवारानगरपरिषदेने मान्सूनपूर्व कामांकडे प्रचंड दुर्लक्ष केले. त्याचे दुष्परिणाम मंगळवारच्या पावसादरम्यान नागरिकांना भोगावे लागले. नगरपरिषदेने सफाई न केल्याने शहरात मंगळवारी जागोजागी पावसाचे पाणी साचले. हे पाणी अडून वस्त्यांमध्ये शिरले. पाण्याचा निचरा करण्यासाठी आता ऐनवेळी नगरपरिषदेने चार सदस्यांचे पथक तयार केले. एक जेसीबी त्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला होता. या पथकाने मंगळवारी दिवसभर विविध भागात सफाई मोहीम राबविली. मात्र हेच काम पावसापूर्वी का केले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर